शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

खोटी आश्वासने देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:09 IST

पाटोदा : विखरणी येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातून अक्षयप्रकाश योजना सुरू होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाअधिकारी वर्गाने मात्र पुन्हा एकदा सहा गावाना ठेंगा दाखवला आहे .

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : विखरणी येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातून अक्षयप्रकाश योजना सुरू होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना विज वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाने मात्र पुन्हा एकदा सहा गावाना ठेंगा दाखवला आहे . शक्य असूनही अक्षयप्रकाश योजना सुरु करत नाही यामुळे विखरनी आणि परिसरातील युवक सकाळी १० वाजता येवला ग्रामीण पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आल्याने चांगलाच पेच निर्माण झाला . एक दोन नाहीतर चक्क सहा खोटे पत्र देणाऱ्या तिनही अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी ठाम भूमिका पंचायत समिती गटनेते मोहन शेलार यानी घेतल्यावर पोलीच निरीक्षक भापकर यानी लेखी फिर्याद घेतली ,चौकशी करु ण गुन्हा दाखल करु असे आश्वासन दिल्यावर सर्व युवकानी पोलिस स्टेशन सोडले. २१ नोव्हेंबर , १० मार्च, २० में असे सलग तीनदा पंचायत समिती सदस्य मोहन शेलार व सहकाऱ्यां आमरण उपोशन केले होते. रास्तारोकोचा इशारा दिला होता,मात्र प्रत्येक वेळेस विज वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाने खोटे पत्र देऊन जनतेची दिशाभूल केली,दि.२४ में रोजी विज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दोन महीन्यात अक्षयप्रकाश योजना सुरु करतो असे लेखी पत्र गावकऱ्यांना दिले होते. त्याला दोन महीने दिनांक २४ रोजी पूर्ण झाले तरी या बेजबाबदार अधिकारी वर्गला या कामाची आठवण राहिली नाही. सदर कामाची कोणत्याही प्रकारची निविदा निघालेली नसताना देखील कार्यकारी अभियंता शैलेश कुमार यानी निविदा निघाल्याचे खोटे पत्र उपोषणकर्त्यांना दिले होते. दी २४ मे रोजी मालेगांव मंडल चे अधीक्षक अभियंता शैलेन्द्र राठोड, मनमाड चे कार्यकारी शैलेश कुमार यांच्या आदेशानुसार प्रभारी कार्यकारी अभियंता सुरेश जाधव यानी दोन महीने मुदतीत अक्षय प्रकाश योजना सुरु करतो असे लेखी पत्र दिले होते. तीन दिवस उपोषण सुरु असल्याने परिसरातील गावातील वातावरण गंभीर झाले होते. विधान परिषद आमदार जयंत जाधव, जेष्ठ नेते अंबादास बनकर, शिवसेना नेते संभाजी पवार, पोलिस निरीक्षक ाापकर , बाळासाहेब लोखंडे यानी मध्यस्थि करु ण दोन महीन्याचे लेखी पत्र देऊन उपोषण सोडले होते, मात्र तरीही या अधिकारी वर्गानेगांभीर्य ठेवले नाही, विधान परिषद आमदार जयंत जाधव यानी पावसाळी अधिवेशनात विखरनी अक्षयप्रकाश योजनेचा तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. आज सकाळी दत्तू नाइकवाडे, माणीक निकम, गणेश पाटिल, तुकाराम तनपुरे, जगन तनपुर, अशोक कोताडे, श्रावण गायके, गोकुळ लोहाकरे, समाधान तनपुरे, हनुमान गुंजाल, योगेश महाले, संदीप गायके,शंकर गायके,शिवाजी निकम,यसह असंख्य कार्यकर्ते हजर होते,