शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

केरोसीन पूर्ववत द्यावे

By admin | Updated: October 29, 2016 00:29 IST

खामखेडा : एक सिलिंडरधारकांची मागणी

खामखेडा : शासनाने नुकतेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील एक सिलिंडरधारकांचा केरोसीन पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांचे हाल होत आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.  या पूर्वी शासनाकडून दोन सिलिंडरधारकांचा रॉकेल पुरवठा बंद करण्यात येऊन शहरी व ग्रामीण असा समान कोटा करण्यात आला होता. आता शासनाने रेशनकार्डवरील एक सिलिंडरधारकास केरोसीन बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याने ग्रामीण भागावर अन्याय झाल्याची चर्चा होताना दिसून येत आहे. शहरी भागातील प्रत्येक बंगल्यावर पाणी गरम करण्यासाठी सौर पॅनल व घरामध्ये इन्हर्टर बसाविण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात चूल पेटविण्याचा किंवा लाइटचा प्रश्न निर्माण होत नाही. या उलट ग्रामीण भागामध्ये परिस्थिती आहे.  ग्रामीण भागामध्ये अगदी मोजक्या लोकांकडे सौर बम्ब किंवा इन्हर्टर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना दररोज सकाळी पाणी गरम करण्यासाठी चूल पेटवावी लागते. आणि तसेच ग्रामीण भागामध्ये काही वेळेस रात्रीचे भारनियमन असते, तेव्हा दिव्यासाठी केरासीनची गरज भासते. तेव्हा चूल व दिव्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला केरोसीन महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात शेतवस्तीवर वास्तव्य करतात. ग्रामीण भागामध्ये एक सिलिंडरधारकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. बऱ्याचशा कुटुंबाला हे एक सिलिंडर दीड-दाने महिने जाते. त्यांचे बारा महिन्यांमध्ये बारा सिलिंडर पूर्ण होत नाहीत. तेव्हा शासनाने एक सिलिंडरधारकास पुन्हा पूर्वीप्रमाणे रेशन कार्डावरील केरोसीनचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)