शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

केबीसी ठेवीदारांचा मंगळवारी हिंगोलीला महामेळावा

By admin | Updated: November 8, 2014 23:59 IST

केबीसी ठेवीदारांचा मंगळवारी हिंगोलीला महामेळावा

  नाशिक : गुंतवणुकीवर तिप्पट रकमेचे आमिष दाखवून जनसामान्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा केबीसीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण यांना सिंगापूरहून त्वरित भारतात आणावे़ चव्हाण कुटुंबीयांची संपत्ती जप्त करून ती गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांना परत द्यावी या मागणीसाठी केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीतर्फे मंगळवारी (दि़११) रोजी हिंगोली येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष करण गायकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़ केबीसीचा प्रमुख संचालक असलेले चव्हाण दांपत्य सिंगापूर येथे पळून गेले असून, न्यायालयाने त्यांना स्टँडिंग अटक वॉरंटही काढले आहेत़ या दोघांनाही भारतात आणण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलावीत़ शारदा चिटफंड घोटाळ्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने केबीसी गुंतवणूकदारांचे पुनर्वसन करावे़ गुंतवणूकदारांना जोपर्यंत त्यांची संपूर्ण रक्कम मिळत नाही तोपर्यंत अटक केलेल्या संशयिताना जामीन देऊ नये़ संचालकांच्या सर्व मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करून गुंतवणूकदारांची रक्कम लवकरात लवकर परत करावी, अशा मागण्यांचे ठराव या मेळाव्यात केले जाणार आहेत़