शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

काश्यपी धरणाचे पाणी गंगापूर धरणात

By admin | Updated: May 8, 2017 02:00 IST

नाशिक : पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे ९३ टक्के जलसाठा असलेल्या काश्यपी धरणामधून पाणीसाठा गंगापूर धरणामध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे

लोकमत न्यू नेटवर्कनाशिक : पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे ९३ टक्के इतका जलसाठा असलेल्या देवरगाव शिवारातील काश्यपी धरणामधून पाणीसाठा गंगापूर धरणामध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत एक हजार ४०३ दशलक्ष घनफूट इतके पाणी काश्यपीमधून गंगापूर धरणात गेले आहे. गंगापूर धरण समूहामध्ये गौतमी, काश्यपी या लहान धरणांचा समावेश होतो. गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने काश्यपीचा जलसाठा चांगला होता. एक हजार ७३३ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा धरणात होता. ९३ टक्के भरलेल्या काश्यपीमधून गंगापूर धरणात पाणी सोडण्यास शनिवारी (दि.६) सुरुवात झाली. दीड हजार दलघफू इतके पाणी गंगापूरमध्ये गेले असून, ७५ टक्के जलसाठा काश्यपीमधून गंगापूरमध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. २५ ते ३० टक्के पाणीसाठा काश्यपीमध्ये ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून परिसरातील शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही.पावसाळा जवळ आल्यामुळे धरणातील पाणीसाठा वर्ग केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डावा, उजवा कालवा, एकलहरे औष्णिक केंद्र आणि महानगरपालिका अशा सर्व घटकांसाठी गंगापूर धरणात पाणीसाठा आरक्षित आहे. गंगापूर धरणावरच शहरवासीयांच्या पाण्याची भिस्त अवलंबून आहे. नाशिकच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीसाठ्याची मागणीही वाढू लागली आहे. यामुळे पावसाळ्यापर्यंत नाशिकला पाणीपुरवठा करण्यासाठी काश्यपीमधून घेण्यात आलेल्या जलसाठ्याचा मोठा आधार राहणार आहे. या जलसाठ्यामुळे गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन जलसाठा ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. जून महिन्यात वरुणराजाने वर्दी दिली अथवा पावसाचे आगमन लांबले तरीदेखील नाशिककरांवर पाणीटंचाईचे सावट ओढावण्याची चिन्हे सध्या नाही.