शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

काश्यपी धरणाचे पाणी गंगापूर धरणात

By admin | Updated: May 8, 2017 02:00 IST

नाशिक : पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे ९३ टक्के जलसाठा असलेल्या काश्यपी धरणामधून पाणीसाठा गंगापूर धरणामध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे

लोकमत न्यू नेटवर्कनाशिक : पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे ९३ टक्के इतका जलसाठा असलेल्या देवरगाव शिवारातील काश्यपी धरणामधून पाणीसाठा गंगापूर धरणामध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत एक हजार ४०३ दशलक्ष घनफूट इतके पाणी काश्यपीमधून गंगापूर धरणात गेले आहे. गंगापूर धरण समूहामध्ये गौतमी, काश्यपी या लहान धरणांचा समावेश होतो. गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने काश्यपीचा जलसाठा चांगला होता. एक हजार ७३३ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा धरणात होता. ९३ टक्के भरलेल्या काश्यपीमधून गंगापूर धरणात पाणी सोडण्यास शनिवारी (दि.६) सुरुवात झाली. दीड हजार दलघफू इतके पाणी गंगापूरमध्ये गेले असून, ७५ टक्के जलसाठा काश्यपीमधून गंगापूरमध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. २५ ते ३० टक्के पाणीसाठा काश्यपीमध्ये ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून परिसरातील शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही.पावसाळा जवळ आल्यामुळे धरणातील पाणीसाठा वर्ग केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डावा, उजवा कालवा, एकलहरे औष्णिक केंद्र आणि महानगरपालिका अशा सर्व घटकांसाठी गंगापूर धरणात पाणीसाठा आरक्षित आहे. गंगापूर धरणावरच शहरवासीयांच्या पाण्याची भिस्त अवलंबून आहे. नाशिकच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीसाठ्याची मागणीही वाढू लागली आहे. यामुळे पावसाळ्यापर्यंत नाशिकला पाणीपुरवठा करण्यासाठी काश्यपीमधून घेण्यात आलेल्या जलसाठ्याचा मोठा आधार राहणार आहे. या जलसाठ्यामुळे गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन जलसाठा ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. जून महिन्यात वरुणराजाने वर्दी दिली अथवा पावसाचे आगमन लांबले तरीदेखील नाशिककरांवर पाणीटंचाईचे सावट ओढावण्याची चिन्हे सध्या नाही.