शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

काश्यपी धरणाचे पाणी गंगापूर धरणात

By admin | Updated: May 8, 2017 02:00 IST

नाशिक : पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे ९३ टक्के जलसाठा असलेल्या काश्यपी धरणामधून पाणीसाठा गंगापूर धरणामध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे

लोकमत न्यू नेटवर्कनाशिक : पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे ९३ टक्के इतका जलसाठा असलेल्या देवरगाव शिवारातील काश्यपी धरणामधून पाणीसाठा गंगापूर धरणामध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत एक हजार ४०३ दशलक्ष घनफूट इतके पाणी काश्यपीमधून गंगापूर धरणात गेले आहे. गंगापूर धरण समूहामध्ये गौतमी, काश्यपी या लहान धरणांचा समावेश होतो. गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने काश्यपीचा जलसाठा चांगला होता. एक हजार ७३३ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा धरणात होता. ९३ टक्के भरलेल्या काश्यपीमधून गंगापूर धरणात पाणी सोडण्यास शनिवारी (दि.६) सुरुवात झाली. दीड हजार दलघफू इतके पाणी गंगापूरमध्ये गेले असून, ७५ टक्के जलसाठा काश्यपीमधून गंगापूरमध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. २५ ते ३० टक्के पाणीसाठा काश्यपीमध्ये ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून परिसरातील शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही.पावसाळा जवळ आल्यामुळे धरणातील पाणीसाठा वर्ग केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डावा, उजवा कालवा, एकलहरे औष्णिक केंद्र आणि महानगरपालिका अशा सर्व घटकांसाठी गंगापूर धरणात पाणीसाठा आरक्षित आहे. गंगापूर धरणावरच शहरवासीयांच्या पाण्याची भिस्त अवलंबून आहे. नाशिकच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीसाठ्याची मागणीही वाढू लागली आहे. यामुळे पावसाळ्यापर्यंत नाशिकला पाणीपुरवठा करण्यासाठी काश्यपीमधून घेण्यात आलेल्या जलसाठ्याचा मोठा आधार राहणार आहे. या जलसाठ्यामुळे गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन जलसाठा ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. जून महिन्यात वरुणराजाने वर्दी दिली अथवा पावसाचे आगमन लांबले तरीदेखील नाशिककरांवर पाणीटंचाईचे सावट ओढावण्याची चिन्हे सध्या नाही.