शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

‘कपाट’ कोंडी फुटण्याची चिन्हे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:10 IST

नाशिक : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंबंधीचे धोरण जाहीर केल्याने शहरात इमारत बांधकामातील ‘कपाट’चा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंबंधीचे धोरण जाहीर केल्याने शहरात इमारत बांधकामातील ‘कपाट’चा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, नदीकाठच्या निळ्या पूररेषेतील बांधकामांना या नियमावलीतून वगळण्यात आल्याने गोदाकाठच्या रहिवाशांची कोंडी होणार आहे. शिवाय, अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी दंडात्मक आकारणी पाहता, या धोरणाला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी शुक्रवारी (दि.२१) धोरण जाहीर केले. त्यामुळे राज्यभरातील असंख्य बांधकामांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंबंधीची बाब न्यायप्रविष्ट होती. शासनाने तयार केलेल्या या धोरणाला न्यायालयाने आक्षेप घेतल्यानंतर नियमावली तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सदर नियमावलीवर शासनाने एक महिन्याच्या आत हरकती व सूचना मागविल्या आहेत. सदर योजनेची अंमलबजावणी करताना स्थानिक प्राधिकरणाकहून कंपाउंट तथा प्रशमन दर आकारले जाणार असून, शाळा, कारखाने, निवासी व व्यावसायिक यांच्यासाठीही सदर योजना लागू असणार आहे. या धोरणामुळे नाशिक शहरातील इमारत बांधकामातील कपाटांचा बव्हंशी प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करताना प्रीमिअम, अतिरिक्त एफएसआय आणि इन्फ्रास्ट्रक्चर असे तीन प्रकारचे दर आकारले जाणार अतिरिक्त बांधकामांवर जमीन मूल्याच्या दहा टक्के वसुली केली जाणार आहे. सदर तीनही प्रकारचे दर अदा करायचे नसेल तर अतिरिक्त बांधकामांच्या पन्नास टक्के व एकूण जमीन मूल्याच्या दहा टक्के असे एकूण साठ टक्के दर अदा करावे लागणार आहेत. त्यामुळे सदर धोरणाबद्दल मोठ्या प्रमाणावर हरकती व सूचना दाखल होण्याची शक्यता आहे. लष्करी हद्दीलगतच्या बांधकामांबाबत प्रश्नचिन्हया धोरणातून हेरिटेज वास्तू, खेळाची मैदाने यावरील बांधकामे वगळण्यात आली आहे. त्यामुळे सदर बांधकामे अधिकृत करता येऊ शकणार नाहीत. नाशकात गेल्या काही वर्षांपासून आर्टिलरी सेंटर लष्करी हद्दीच्या परिसरातील बांधकामांचाही प्रश्न गाजतो आहे. शासनाच्या या धोरणात लष्करी भागाच्या हद्दीला लागून असलेली अनधिकृत बांधकामे सुद्धा वगळण्यात आल्याने परिसरातील बांधकामे नियमितीकरणाचाही प्रश्न ‘जैसे थे’ राहणार आहे.