शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

कळवण तालुक्यातील धरणे फुल्ल !

By admin | Updated: September 13, 2014 00:56 IST

कळवण तालुक्यातील धरणे फुल्ल !

कळवणतालुक्यात सुरू असलेल्या संततधारेने चणकापूर, अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पासह तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्प, पाझर तलाव, सीमेंट बंधारे १०० टक्के भरले आहेत. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून गिरणा व पुनंद नदीपात्रात हजारो क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा व पुनंद नदीला पूर येणार असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.शेकडो पाझर तलाव व सीमेंट बंधारे पावसामुळे फुल्ल झाल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ झाली असून, लपा प्रकल्प, तलाव व बंधारे शेतकरी बांधवांना वरदान ठरले आहे. गेल्या वर्षी १० सप्टेंबरपर्यंत चणकापूर धरण लाभक्षेत्रात ५०१ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी आजपर्यंत ८०२ मिमी पाऊस झाला असल्याची नोंद शासन दप्तरी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३०० मिमी पाऊस जास्त झाल्याने लपा प्रकल्प व तलाव पाण्याने तुडुंब भरले आहेत. यावेळी सर्व नद्या, नाले पाण्याने तुडुंब वाहत आहेत. चणकापूर उजव्या कालव्यालादेखील पाणी सोडल्याने कालवा क्षेत्रातील विहिरीच्या पातळीत वाढ झाली असून, एक महिन्यापासून जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी व नाले यांना पूर आला आहे. चणकापूर व अर्जुनसागर या प्रकल्पातून गिरणा व पुनंद नदीत हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. (वार्ताहर)