शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

‘गार्ड आॅफ आॅनर’ने जयवर्धने भारावला

By admin | Updated: August 15, 2014 00:23 IST

जयवर्धने गुरुवारी पाकिस्तानविरुद्ध अखेरची कसोटी खेळायला मैदानात उतरला तेव्हा श्रीलंकन खेळाडूंनी दिलेल्या ‘गार्ड आॅफ आॅनर’ने हा अनुभवी खेळाडू भारावून गेला़

नाशिक : जागतिक व्यापारात आयात व निर्यातीसंदर्भात एकच धोरण असून, आपल्या देशात मात्र त्याबाबत वेगवेगळे धोरण आहे. कृषिमालाच्या निर्यातबंदीला राज्य शासनाचा प्रखर विरोध असून, केंद्र सरकारकडे तशी भूमिका मांडण्यात आली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.राज्याच्या कृषी व पणन विभागामार्फत कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, फलोत्पादनमंत्री जितेंद्र आव्हाड, जलसंधारणमंत्री नितीन राऊत, कृषी राज्यमंत्री संजय सावकारे, न्या. साधना जाधव, अपर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, आमदार शिरीषकुमार कोतवाल, आमदार ए. टी. पवार, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे आदि उपस्थित होते.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, देशाच्या तुलनेत राज्याचे सिंचन क्षेत्र अत्यंत कमी १८ टक्के इतकेच आहे. त्यामानाने पंजाबचे ९८ टक्के, तर हरियाणाचे ९० टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. (पान ८ वर)सिंचन क्षेत्र कमी असल्यामुळे सिंचनासाठी जास्तीचा निधी राज्याला मिळावा म्हणून राज्य सरकारने केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. दुष्काळी परिस्थितीतही फायदेशीर ठरणाऱ्या साखळी बंधाऱ्यांसाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यात येणार आहे. आज राज्यात एकाचवेळी तीन हजार साखळी बंधाऱ्यांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामान बदलत आहे. १०० वर्षांत कधी झाली नव्हती इतकी गारपीट यावर्षी होऊन त्यासाठी १० ते १२ हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. कृषी विद्यापीठ आणि शेतकऱ्यांशी सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात येईल, जेणेकरून शेतकऱ्यांना बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानात शेती करणे सोपे जाईल. क्लोज युवर ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान बदलाचे लघुसंदेश देण्यात आले. असा शेतकऱ्यांचा गट निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. किरकोळ बाजारात थेट परदेशी गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागणार आहोत. कांद्यासह अन्य शेतमालावर निर्यातबंदी करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारचा विरोध असून, ही निर्यातबंदी रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी चव्हाण यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी राबविल्या गेलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत चांगले उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांमुळेच आज महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनाही पेन्शन मिळाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका यावेळी विखे-पाटील यांनी मांडली. फलोत्पादनमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, आपला शेतीशी संबंध नाही. मात्र एककाळ असा होता की भारत अमेरिकेच्या दारात धान्यासाठी उभा राहत असे आणि आज एककाळ असा आहे की, भारत हा देश सर्वसामान्यांसाठी अन्नसुरक्षा राबविणारा देश बनला आहे. शेतकऱ्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, कष्टाने उगविल्यानंतर जेव्हा चार पैसे कमावण्याची वेळ येते त्यावेळी नेमकी शेतमालावर निर्यातबंदी घालण्याचे काम केंद्र सरकार करू लागले आहे. पावसाचे आणि नक्षत्रांचे काहीही नाते उरलेले नाही. निसर्ग चुकल्याने शेतकऱ्यांचे अनेकदा नुकसान झाले. निसर्ग चुकला तसे आपणही (शेतकरीही) सरकार निवडण्यात चुकले, अशी कोपरखळीही भुजबळ यांनी मारताच टाळ्यांचा कडकडाट झाला. आताच्या केंद्र सरकारमध्ये मंत्र्यांना शेतकऱ्यांचे म्हणणे काही समजत नाही. समजले तर त्यावर काय उपाययोजना करायची ते समजायला हवे. ते समजले तर या मंत्र्यांच्या शब्दाला मंत्रिमंडळात किंमत हवी. आता हे सर्व कसे जमायचे, हाही एक प्रश्नच आहे, असे सांगताच हशा पिकला. त्यानंतर राज्यातील ८० पुरस्कारार्थींना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक डी. जी. काळाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे, जिल्हा कृषिविकास अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे, ‘आत्मा’चे संचालक के. पी. मोेते, मोहीम अधिकारी राजेंद्र साळुंखे, उपविभागीय कृषी अधिकारी नरेंद्र देशमुख आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)