शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अंबोली, अहल्या धरणांचे जलपूजन

By admin | Updated: July 11, 2016 23:27 IST

अंबोली, अहल्या धरणांचे जलपूजन

 त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहरात रविवारी पूर आल्याने तेली गल्ली, बोहरपट्टी, नगरपालिका कार्यालय, अमृतकुंभासमोर आदि ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. श्रद्धाळू महिलांनी गोदामाईची खणानारळाने ओटी भरली. अहल्या-गोदावरी संगम घाटावर पुलाला पाणी लागले होते. पाण्याचा वेग प्रचंड होता. येथे गोदामाई अदृश्य स्वरूपात होती ती श्रीरामाने बाण मारून दृश्य स्वरूपात आणल्याचे सांगितले जाते, त्या चक्रतीर्थाजवळ गोदामाईचे रौद्ररूप पाहावयास मिळाले. गोदावरीने त्या ठिकाणी गोल फिरत नाशिककडे प्रयाण केले. या ठिकाणी गोदावरीचे स्वरूप पाहिल्यावर नाशिकला किती पूर आला असावा याची कल्पना येते. जाणकारांनी सांगितले, असा पूर आम्ही कधी पाहिला नव्हता. जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी दिसत होते तरी पाऊस थांबण्याची चिन्हं दिसत नव्हती. अंबोली धरण परिसरात पडलेल्या दाट धुक्याने जवळचेही दिसत नव्हते. वाहनचालक दिवे लावून वाहने चालवित होते. संपूर्ण अंबोली धरण धुक्यात हरवले होते. धरण पूर्णपणे भरले आहे. आता पालिकेने गावात नियमित दररोज पाणी सोडण्यास हरकत नसावी. ठिकठिकाणी निसर्गाची व पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक सहकुटुंब आले होते. पहिणे शिवारातील बिअर शॉपी आज बंद ठेवण्यात आली होती. तरीही काही जण तेथे डोकावत होते. या परिसरातील ढाबे खवय्यांसाठी प्रसिद्ध असल्याने जवळपास ९ ते १० ठिकाणी घरगुती पद्धतीने मटनाची भाजी, बाजरीची भाकरी, जोडीला भात, ठेचा वगैरे जेवणाचा थाट या ठिकाणी असतो. अर्थात शाकाहारांसाठीदेखील वेगळी व्यवस्था असते. सुटी असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला घेऊन वीकेण्ड साजरा करतात. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असतो. त्र्यंबकेश्वर हे पर्यटनस्थळ म्हणून पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. मात्र आता ब्रह्मगिरी-गंगाद्वार तसेच पहिणे परिसर व दुगारवाडी धबधबा चांगल्या प्रकारे विकसित व्हावा, अशी पर्यटकांची मागणी त्यांनी बोलून दाखविली. (वार्ताहर)