शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

वाल्मीकीनगरला इसमाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:14 IST

--- इमारतीच्या जलकुंभावरून कोसळून युवक ठार पंचवटी : म्हसरूळ शिवारातील दुर्गानगर येथे एका चार मजली इमारतीवरील जलकुंभावरून खाली कोसळून ...

---

इमारतीच्या जलकुंभावरून कोसळून युवक ठार

पंचवटी : म्हसरूळ शिवारातील दुर्गानगर येथे एका चार मजली इमारतीवरील जलकुंभावरून खाली कोसळून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे राहणारा अंकुश रामनाथ गायकवाड (२८) हा त्याच्या नातेवाइकाकडे राहत होता. काल बुधवारी तो घरातून बाहेर गेला व शेजारी असलेल्या एका चारमजली इमारतीच्या गच्चीवर बांधलेल्या जलकुंभावर चढला असता तेथून पाय घसरून जमिनीवर कोसळला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला व हातापायाला गंभीर मार लागला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मयत युवक हा मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

----

कोयत्याने वार करत जबरी लूट; तिघांवर गुन्हा दाखल

पंचवटी : लासलगाव येथून घराकडे परतणाऱ्या दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून डाव्या हातावर कोयत्याने हल्ला करत जखमी करून बळजबरीने खिशातील १८ हजार ८०० रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा गुन्हा घडला.

याबाबत पाथर्डी गाव येथे राहणाऱ्या सोमनाथ कचरू पालवे याने आडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री पालवे व त्याचा मित्र भारत तायडे असे दोघे जण लासलगाव येथून दुचाकीने घराकडे जात असताना औरंगाबाद-निलगिरीबाग रोडवरील सिग्नलवर पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवावरून आलेल्या तिघांनी त्यांची दुचाकी रोखून काही कारण नसताना दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या खिशातील १८ हजार ८०० रुपये काढून घेत तायडे याच्या डाव्या हातावर कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच पोलिसांत तक्रार दिली तर तुम्हाला ठार मारू, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

---

सराईत गुंडांकडून तलवारीने युवकावर हल्ला

नाशिक : कुरापत काढून संशयितांनी मिळून एकावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गंगापूर सातपूर लिंक रोडवरील मोतीवाला कॉलेजसमोर घडली. या हल्ल्यात आशिष सुनील दत्त महिरे (२४, रा. शिवाजीनगर) हा युवक जखमी झाला आहे.

आशिष याच्या फिर्यादीनुसार संशयित अक्षय उत्तम भारती, अनिकेत विजय पगारे, रवी ऊर्फ माया दामोदर गांगुर्डे (२१, रा. शिवाजीनगर) यांनी मंगळवारी (दि.१६) हल्ला केला. वाढदिवसाच्या दिवशी तुझ्या मुलांनी भांडण केले अशी कुरापत काढून संशयितांनी आशिषला मारहाण केली. तलवारी व कोयत्याने आशिषवर हल्ला चढवून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. यातील अक्षय भारती याच्याविरोधात घरफोडी, दरोडा, जबरी चोरी असे १२ गुन्हे दाखल आहेत. तर रवी गांगुर्डे विरोधात दरोड्याचा व अनिकेत पगारे विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.