शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
2
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
3
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
4
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
5
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
6
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
7
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
8
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
9
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
10
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
11
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
12
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
13
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
14
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
15
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
16
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
17
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
18
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
19
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
20
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

इसिसबाबकाश्मीरचा मुद्दा संपला : हंसराज अहिर

By admin | Updated: August 21, 2016 23:55 IST

इसिसबाबकाश्मीरचा मुद्दा संपला : हंसराज अहिर

नाशिक : भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा प्रयत्न केले, मात्र पाकिस्तान सुधारण्याच्या स्थितीत नाही़ प्रत्येक वेळी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानसमोर पंतप्रधान मोदींनी पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून राजकीय मुत्सद्देगिरी दाखविल्याने पाकची कोंडी झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर आता केवळ पाकव्याप्त काश्मीरचा विषय शिल्लक राहिला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले.देशाच्या ७० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केंद्रीय मंत्री व खासदारांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांना भेट देण्यास सांगितले होते़ त्यानुसार नाशिकमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर व येवला येथील स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी रविवारी भेट दिली़ यानंतर शहर भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अहिर बोलत होते़काश्मिरबाबत भारताच्या भूमिकेविषयी अहिर म्हणाले, आतापर्यंत पाकिस्तान केवळ काश्मिरच्या मुद्दा पुढे करून त्याबाबत आंतरराष्ट्रीय पटलावर मुद्दा उपस्थित करण्याच्या कारवाया करीत होते. काश्मिरबाबत पाकिस्तानची पूर्वीचीच भूमिका आजही कायम असली तरी पंतप्रधानाच्या भूमिकेमुळे काश्मिरचा मुद्दा वेगळ्या वळणावर आला आहे. पाकव्याप्त काश्मिरमधील बलुचिस्तानमधील नागरिकांनीच पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळविण्याची मागणी केली आहे़ बलुचिस्तानमधील नागरिकांच्या प्रश्नाकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधून काश्मिरबाबतच्या चर्चेला कलाटणी दिल्याने काश्मिरचा मुद्दाही बदलला असल्याचे अहिर म्हणाले. भारताची काश्मिरबाबत भूमिका स्पष्ट असून याबाबत पाकिस्तानचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही़ पाकिस्तानची ताकद आम्ही ओळखून असून यापूर्वी तीन वेळा त्यांना भारताने धूळ चारली आहे़ पाकिस्तानने आपल्या ताकदीचा भारताविरोधी वापर करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल़असेही अहिर पत्रकार परिषदेत म्हणाले. त केंद्र गंभीर देशभरातील केरळ तसेच प्रामुख्याने महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील इसिसच्या प्रसाराबाबत केंद्र सरकार गंभीर आहे़ महाराष्ट्रातील मराठवाडा व परभणीतील इसिसच्या प्रभावाबाबतचा अहवाल राज्य सरकारकडून मागविण्यात आला आहे़ यामध्ये राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे तथ्य आढळल्यास केवळ राज्याचीच नव्हे तर केंद्राची संपूर्ण तपासी यंत्रणा याचा मूळापर्यंत शोध घेईल़ तसेच जी कुटुंबे इसिसच्या प्रभावाखाली असतील त्यांना यातून संपूर्णत: बाहेर काढेपर्यत हे काम सुरू राहणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री अहिर यांनी सांगितले़