शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

आखाड्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची प्रचिती

By admin | Updated: September 25, 2015 22:27 IST

त्र्यंबकेश्वरमध्ये अखेरची पर्वणी : लोकांचा सहभाग

त्र्यंबकेश्वर : शैव पंथीय साधू-महंत मुळातच कोपिष्ट. जरा कुठे मनासारखे होत नसेल तर त्यांना सहन होत नाही अशी ख्याती असतानाही त्र्यंबकेश्वर येथे पार पडलेली अखेरची पर्वणीही त्याच उत्साहात आणि कोणत्याही राजी नाराजीच्या सावटाशिवाय पार पडली. इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या आखाड्यांच्या मिरवणुका आणि त्यांची क्रमवारी याबाबत घुसखोरी न करता शिस्तीचे पालन करीत मिरवणुका पार पडल्याने नाशिकपेक्षा त्र्यंबकेश्वरचे वेगळेपण यंदा अधोरेखित झाले. विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाची तत्परता हे दोन्ही गुण वाखाणण्याजोगेच होते.नाशिकमध्ये असलेल्या वैष्णव पंथीयांच्या तीन आखाड्यांमध्येही मतभेद आणि वादामुळे यंदाचा कुंभमेळा चर्चेत ठरला. दुसरीकडे त्र्यंबकेश्वरी दहा आखाडे आणि त्यांचे अनेक खालसे असतानाही त्यांनी संयमांची भूमिका घेतानाच आपसातील मतभेद चव्हाट्यावर येऊ दिले नाही. ही एक जमेची बाजू तशीच तिसरी मिरवणूकही पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. नीलपर्वतीच्या पायथ्याशी खंडेराव मंदिरासमोर आवाहन आखाड्याजवळच मिरवणुकीची सुरुवात होते. अखेरच्या पर्वणीला पिंपळद येथून जुना आखाडा वाजत गाजत येत असताना अगोदरच सज्ज झालेले ‘आवाहन’ आखाड्याचे साधू-महंत मर्दानी खेळ करून जल्लोष करीत होते, मात्र त्यांच्यावर त्यांच्यातील ज्येष्ठांचे नियंत्रण होते. प्रसंगी छडीमार देण्यासही ते मागे पुढे पाहत नव्हते. आपल्या साधू- महंतांना एकाबाजूला रांगेत बसवून ‘हर हर महादेव’ असा जयजयकार करणाऱ्या या साधूंनी कुठेही घुसखोरी केली नाही. जुना आखाडा खंडेराव मंदिराच्या पायथ्याथी दाखल झाल्यानंतर प्रथेनुसारच त्यात आवाहन आखाड्याचे साधू सहभागी झाले. अन्य सर्व आखाडेही वेळ आणि क्रमानुसारच दाखल होत गेले. त्यामुळे शैव आखाड्यांचे व्यवस्थापन कौशल्य अधोरेखित झाले.