शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आखाड्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची प्रचिती

By admin | Updated: September 25, 2015 22:27 IST

त्र्यंबकेश्वरमध्ये अखेरची पर्वणी : लोकांचा सहभाग

त्र्यंबकेश्वर : शैव पंथीय साधू-महंत मुळातच कोपिष्ट. जरा कुठे मनासारखे होत नसेल तर त्यांना सहन होत नाही अशी ख्याती असतानाही त्र्यंबकेश्वर येथे पार पडलेली अखेरची पर्वणीही त्याच उत्साहात आणि कोणत्याही राजी नाराजीच्या सावटाशिवाय पार पडली. इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या आखाड्यांच्या मिरवणुका आणि त्यांची क्रमवारी याबाबत घुसखोरी न करता शिस्तीचे पालन करीत मिरवणुका पार पडल्याने नाशिकपेक्षा त्र्यंबकेश्वरचे वेगळेपण यंदा अधोरेखित झाले. विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाची तत्परता हे दोन्ही गुण वाखाणण्याजोगेच होते.नाशिकमध्ये असलेल्या वैष्णव पंथीयांच्या तीन आखाड्यांमध्येही मतभेद आणि वादामुळे यंदाचा कुंभमेळा चर्चेत ठरला. दुसरीकडे त्र्यंबकेश्वरी दहा आखाडे आणि त्यांचे अनेक खालसे असतानाही त्यांनी संयमांची भूमिका घेतानाच आपसातील मतभेद चव्हाट्यावर येऊ दिले नाही. ही एक जमेची बाजू तशीच तिसरी मिरवणूकही पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. नीलपर्वतीच्या पायथ्याशी खंडेराव मंदिरासमोर आवाहन आखाड्याजवळच मिरवणुकीची सुरुवात होते. अखेरच्या पर्वणीला पिंपळद येथून जुना आखाडा वाजत गाजत येत असताना अगोदरच सज्ज झालेले ‘आवाहन’ आखाड्याचे साधू-महंत मर्दानी खेळ करून जल्लोष करीत होते, मात्र त्यांच्यावर त्यांच्यातील ज्येष्ठांचे नियंत्रण होते. प्रसंगी छडीमार देण्यासही ते मागे पुढे पाहत नव्हते. आपल्या साधू- महंतांना एकाबाजूला रांगेत बसवून ‘हर हर महादेव’ असा जयजयकार करणाऱ्या या साधूंनी कुठेही घुसखोरी केली नाही. जुना आखाडा खंडेराव मंदिराच्या पायथ्याथी दाखल झाल्यानंतर प्रथेनुसारच त्यात आवाहन आखाड्याचे साधू सहभागी झाले. अन्य सर्व आखाडेही वेळ आणि क्रमानुसारच दाखल होत गेले. त्यामुळे शैव आखाड्यांचे व्यवस्थापन कौशल्य अधोरेखित झाले.