शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:14 IST

विना परवानगीने शेतात वनतळ्याचे काम सुरु मनोज देवरे लोकमत न्यूज नेटवर्क कळवण : तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका आदिवासी ...

विना परवानगीने शेतात वनतळ्याचे काम सुरु

मनोज देवरे

लोकमत न्यूज नेटवर्क

कळवण : तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका आदिवासी मालकीच्या खासगी क्षेत्र असलेल्या शेतात वन विभागाच्या यंत्रणेने कुठलीही परवानगी न घेता वनतळ्याच्या कामाला सुरुवात करून खोदकाम सुरू केले आहे. यामुळे संबंधित आदिवासी कुटुंब भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, ओतूर परिसरात वन विभागाने ओतूर, मुळाणे भागात अशा पद्धतीने विनापरवानगी शेतकऱ्यांच्या खासगी क्षेत्रात शेतात वनतळे केल्याचे बोलले जात असून वन विभागाच्या मनमानी पद्धतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी ओतूर परिसरातील जनतेने केली असून गोधडे कुटुंबीयांनी न्याय मिळवून देण्याची मागणी आमदार नितीन पवार यांच्याकडे केली आहे.

पेसा कायदाअंतर्गत अशा पद्धतीने ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय राखीव वन व खासगी क्षेत्रात वनतळे करण्याचा अधिकार कुणालाही नाही. परंतु वन विभागाकडून कळवण तालुक्यात मनमानी कारभार सुरू असल्याचे ओतूर येथील वनतळ्याच्या कामानिमित्ताने समोर आले आहे.

ओतूर येथील आदिवासी शेतकरी तानाजी काशिराम गोधडे यांच्या मालकीच्या गट क्र. ८८/३ मध्ये ८० आर जमीन त्यांची परवानगी न घेता त्यांच्या शेतात विनापरवानगी पोकलॅनच्या साहाय्याने वन विभागाच्यावतीने वनतळ्याच्या कामास सुरुवात करण्यात आली असून खोदकाम सुरू केले आहे. गोधडे यांनी या कामास हरकत घेतली असून शेतात वनतळे झाल्यावर त्यांना शेतजमीन राहणार नसून ते भूमिहीन होणार आहेत. गोधडे यांना तीन मुले असून त्यांच्या कुटुंबीयांची उपजीविका करण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे.

कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात राष्ट्रपती यांनी घोषित केलेले अनुसूचित क्षेत्र आहे. या क्षेत्रास पेसा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार पेसा क्षेत्रातील आदिवासींच्या ग्रामसभांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. तसेच वनहक्क कायदा २००६ मधील कलम ३ (१) मध्ये वननिवासी अनुसूचित जमाती किंवा पारंपरिक वननिवासी यांना प्राप्त झालेले हक्क नमूद केले आहेत. अनुसूचित क्षेत्रात वन विभागाने कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्या क्षेत्रातील ग्रामसभेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असताना ओतूर परिसरात वन विभागअंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामांसाठी वन विभागाने कुठलीही परवानगी घेतलेली नसल्याचे समोर आले आहे.

कोट...

कळवण व सुरगाणा तालुक्यात वन विभागाचा मनमानी कारभार असून खासगी क्षेत्रात वनतळे बांधून आदिवासींना भूमिहीन करण्याचा वन विभागाचा डाव असल्याचे ओतूरच्या घटनेवरून समोर आले आहे. त्यामुळे कळवण व सुरगाणा तालुक्यात गेल्या पाच वर्षात वन विभागाने केलेल्या मनमानी कारभाराची व कामांची चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहे.

- नितीन पवार, आमदार, कळवण

इन्फो...

कर्मचारी झाले कंत्राटदार

वन विभागाने काम करीत असताना पूर्वी केलेल्या सिटीच्या जागी परत नवीन सिटी केल्या. माती नालाबांध जवळपास असताना त्याच्या जवळच माती नालाबांध केले. परिणामी शासनाच्या खर्चाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय झाला असून कळवण व सुरगाणा तालुक्यातील काही कर्मचारी कंत्राटदार झाले असून तेच वन विभागाची कामे करीत असल्याचे समोर आले आहे.