शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

मुलाखती अगोदरच उमेदवार निश्चित

By admin | Updated: January 24, 2017 23:13 IST

शिवसेना : पदाधिकाऱ्यांनीच परस्पर पॅनल ठरविल्याचा इच्छुकांचा आरोप

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची औपचारिकता सुरू असताना, शिवसेनेच्या काही इच्छुकांनी तर संपर्कप्रमुख अजय चौधरी यांच्यासमोरच हा फार्स असल्याचा आरोप केल्याचे वृत्त आहे. काही पदाधिकाऱ्यांनी अन्य पक्षांतील इच्छुकांना आपल्याबरोबरच घेऊन प्रचार सुरू केल्याने आता मुलाखती कशासाठी घेतात, असा प्रश्न उपस्थित केल्याचे समजते.  महापालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या शिवसेनेच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयात मुलाखती घेणे सुरू असून, त्यातही मूळ पक्षातील कार्यकर्त्यांबरोबरच निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी आलेल्यांची संख्या अधिक आहे त्या पार्श्वभूमीवर वादाला तोंड फुटल्याचे समजते. नाशिक पश्चिममधील एका प्रभागाच्या मुलाखतीच्या दरम्यान, दोन इच्छुकांनी या मुलाखतींचा फार्स असल्याचे मत व्यक्त केले. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचा एक माजी नगरसेवकाला पक्षात प्रवेश दिल्यानंतर त्याच्यासमवेत प्रचार सुरू केला तसेच पक्षातील एका महिलेला पॅनलमध्ये घेतले आणि आपण ज्यावेळी आपण इच्छुक असल्याचे पदाधिकाऱ्याला सांगितले, त्यावेळी पदाधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच आपले तीन जणांचे पॅनल निश्चित झाल्याचे सांगितले आणि प्रचारही सुरू झाला, असे संबंधित इच्छुकाने सांगताना असे असेल तर आता मुलाखती कशासाठी, असा प्रश्न केल्याचे सांगण्यात आले.  पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांचे योगदान आणि पक्षासाठी किती गुन्हे दाखल करून घेतले, असे प्रश्न केले जातात. अन्यत्र पक्षांतर केले होते काय, असे विचारणा केली जाते, मग निवडणुकीच्या तोंडावर पक्षात घेतलेल्या अन्य पक्षांतील आजी-माजी नगरसेवकांचे काय योगदान आहे, असा प्रश्नही दोघा इच्छुकांनी केल्याचे समजते.  याशिवाय शिवसेनेत अनेकांनी आपल्या स्वत:च्या उमेदवारीबरोबरच पत्नी, मुलगा, भाऊ, भावजयी अशा अनेकांसाठी दावेदारी केली असून त्याविषयीही मूळ कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेतील काही विद्यमान नगरसेवकांनी आपल्या कुटुंबीयासाठी उमेदवारी मागितली असून, त्यात सिडको विभागात अशाप्रकारे सर्वाधिक दावेदारी आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून दाखल झालेल्या एका नगरसेवकाने एकाच प्रभागातून स्वत:, पत्नी आणि मुलगा यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे, तर एका विद्यमान नगरसेवकाने आपल्या प्रभागात पती-पत्नी अन्य प्रभागांतून आपल्या चिरंजिवांसाठी दावेदारी केली आहे. प्रभाग आरक्षित झाल्याने कुटुंबातील सदस्यांना पुढे करणे ठीक, परंतु येथे मात्र एकेका कुटुंबात किती उमेदवारी द्याव्यात याचा विचार पक्षाने करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)