शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

मराठा आरक्षणासाठी लॉकडाऊननंतर तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:15 IST

नाशिक : राज्य सरकारने आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास लॉकडाऊन संपल्यानंतर संपूर्ण राज्यात तीव्र आंदोेलनाचा भडका उडेल, असा इशारा ...

नाशिक : राज्य सरकारने आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास लॉकडाऊन संपल्यानंतर संपूर्ण राज्यात तीव्र आंदोेलनाचा भडका उडेल, असा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी नाशिकमध्ये सोमवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत दिला.

सर्वाेच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी बोलताना विनायक मेेटे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आता पोपटपंची नव्हे, तर गांभीर्यपूर्वक कृतीची आ‌वश्यकता असून, सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्यपालांमार्फत केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा आणि केंद्रीय आयोगाने हा अहवाल राष्ट्रपतींकडे पाठविल्यानंतर शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन परिस्थिती मांडावी. एखाद्या समाजास आरक्षण देण्यासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. मात्र, त्यास मागास ठरवण्याचा अधिकार राज्याला नाही, असे न्यायालयाने म्हटल्याचे त्यांनी नमूद करताना निकालपत्रात अनेक विरोधाभास दिसत असल्याचे ते म्हणाले. मराठा आरक्षण सुनावणीकडे राज्य सरकारचे लक्ष नव्हते. वकील आणि याचिकाकर्त्यांमध्ये समन्वय नव्हता. कागदपत्र वेळेवर न्यायालयात पोहोचली नाहीत. न्यायालयास अर्धवट माहिती दिली गेली. तसेच गायकवाड अहवालाचे भाषांतर करून न्यायालयासमोर मांडले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या सगळ्याला आघाडी सरकार आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण जबाबदार असून, त्यांनी ताबडतोब अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्याचप्रमाणे, न्यायालयाच्या निकालाचा बारकाईने अभ्यास करून नवीन मार्ग काढण्याकरिता ज्येष्ठ विधिज्ञांची समिती स्थापन करावी. आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजास तत्काळ इडब्ल्यूएस आरक्षण लागू करावे. आरक्षण रद्दच्या निर्णयापूर्वीची नोकरभरती तत्काळ पूर्ण करून नियुक्त्या द्याव्यात. आरक्षण नसल्याने आता मराठा समजाला ओबीसीप्रमाणे सवलती लागू कराव्यात, अशी मागणी मेटे यांनी केली.