शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

मनपाच्या ‘नगररचना’त अपुरे मनुष्यबळ

By admin | Updated: March 17, 2017 00:04 IST

प्रकरणे प्रलंबित : विकास नियमावलीमुळे वाढणार ताण

नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागात अपुऱ्या मनुष्यबळामुळे बांधकामविषयक प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत असून, येत्या काही दिवसांत राज्य शासनाने प्रसिद्ध केलेला शहर विकास आराखडा आणि शहर विकास नियंत्रण नियमावलीमुळे बांधकाम परवानग्यांसाठीही अर्जांचा डोंगर वाढण्याची शक्यता आहे. प्रकरणे मंजुरीसाठी विलंब लागत असल्याने बांधकाम व्यवसायावर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे.महापालिकेच्या नगररचना विभागात सद्यस्थितीत सुमारे ३५ अभियंत्यांचा कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहरात ‘कपाट’ प्रकरणामुळे बांधकाम व्यवसाय सुस्त होता. माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या कारकीर्दीत महापालिकेत एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या होत्या. त्यात नगररचना विभागाचाही समावेश होता. नगररचना विभागात तीन ते पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अभियंत्यांना हलविण्यात आले होते. मात्र, बदली अभियंत्यांची संख्या कमी प्रमाणात देण्यात आली होती. सद्यस्थितीत नगररचना विभागात सुमारे २० अभियंत्यांचा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. परंतु, नगररचना विभागाकडे विविध प्रकरणांसंबंधीचा वाढता ताण लक्षात घेता मनुष्यबळ अपुरे पडत आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणावर बांधकामविषयक प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्य शासनाने शहर विकास आराखडा भागश: तसेच शहर विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध केली आहे. शहर विकास नियंत्रण नियमावलीतील काही तरतुदींबाबत अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. मात्र, येत्या सोमवारी (दि.२०) आयुक्तांनी क्रेडाईसह बांधकामाशी निगडित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले असल्याने त्यातून तोडगा निघण्याची शक्यता आहे. आयुक्तांच्या अहवालानंतर शासनाकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, नव्या नियमावलीनुसार बांधकाम परवानग्यांसंबंधी अर्जांचा ओघ सुरू होणार आहे. अशावेळी नगररचना विभागात अपुरे मनुष्यबळाच्या माध्यमातून प्रकरणांना विलंब लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नगररचना विभागात तातडीने प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)