शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

प्रारंभीचे अडीच हजार बळी ३६१ दिवसात; नंतरचे अडीच हजार ६२ दिवसात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST

नाशिक : जिल्ह्यातील बळींच्या संख्येने तब्बल ५ हजार बळींचा टप्पा पार केला असून गत हजार बळी तर अवघ्या २५ ...

नाशिक : जिल्ह्यातील बळींच्या संख्येने तब्बल ५ हजार बळींचा टप्पा पार केला असून गत हजार बळी तर अवघ्या २५ दिवसात गेले आहेत. आतापर्यंतच्या बळींच्या संख्येचे वर्गीकरण दोन भागात केल्यास पहिले अडीच हजार बळी होण्यासाठी ३६१ दिवस म्हणजे जवळपास एक वर्षभराचा कालावधी गेला होता. तर त्यानंतरचे अडीच हजार बळी अवघ्या ६२ दिवसात म्हणजे अवघ्या दोन महिन्यात गेले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होऊ लागले असले तरी त्या प्रमाणात बळींच्या संख्येत घट आलेली नाही. नाशिकसाठी मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने सर्वाधिक घातक ठरले. त्यातही एप्रिल आणि मे या दोन महिन्यातच जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळेच चार हजार ते पाच हजार बळींदरम्यानचा टप्पा अवघ्या २५ दिवसात गाठला गेला. त्याआधीचा म्हणजे तीन हजार ते चार हजार बळींचा टप्पा तर त्याहूनही दोन दिवस कमी म्हणजे २३ दिवसातच गेले होते.

इन्फो

गतवर्षी ८ एप्रिलपासून ते यंदा ८ जूनपर्यंत

जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण २९ मार्चला लासलगावला आढळला होता. तर पहिला बळी हा ८ एप्रिल २०२० या दिवशी मालेगावला गेला होता. पहिल्या लाटेतील बाधित आणि मृत्यूचा वेग दुसऱ्या लाटेच्या तुलनेत खूपच कमी होता. पहिल्या लाटेतील प्रारंभीचे १०० बळी जाण्यास ६२ दिवसांचा कालावधी लागला होता. तर प्रारंभीच्या हजार रुग्णांसाठी पाच महिन्यांहून अधिक म्हणजे १५५ दिवसांचा कालावधी लागला होता. त्यानंतर दोन हजारपर्यंत बळी जाण्यास अजून ११८ तर तीन हजारपर्यंत बळींची संख्या जाण्यास अजून १०२ दिवस लागले होते. मात्र, अखेरच्या टप्प्यातील प्रत्येकी हजार बळी अनुकमे २३ आणि २५ दिवसातच गेल्याने या दुसऱ्या लाटेची तीव्रताच त्यातून अधोरेखित होते.

इन्फो

सर्वाधिक बळी ग्रामीणमध्ये

जिल्ह्यात गतवर्षी अगदी प्रारंभीच्या काळात मालेगाव भागात वेगाने बळी जात होते. त्यानंतर नाशिक शहरातील बळींच्या संख्येत मोठ्या वेगाने वाढ झाली. तर दुसऱ्या लाटेत एप्रिल आणि मे महिन्यात नाशिक ग्रामीण क्षेत्रातील बळी प्रचंड वेगाने वाढले होते. त्यामुळेच आतापर्यंतच्या पाच हजार बळींपैकी सर्वाधिक बळी हे २४४८ नाशिक ग्रामीणमधील तर त्याखालोखाल बळी हे नाशिक शहरातील २१६४ आहेत. तर मालेगाव मनपा क्षेत्रातील ३१९ आणि जिल्हा बाह्य बळींची संख्या १०० वर पोहोचली आहे.

इन्फ़ो

आतापर्यंतचे बळी आकड्यात

०१ बळी - ०८ एप्रिलपासून

१००० बळी - १५५ दिवसात ( १० सप्टेंबर)

२००० बळी - ११८ दिवसात (७ जानेवारी )

३००० बळी - १०२ दिवसात ( २० एप्रिल)

४००० बळी - २४ दिवसात (१३ मे )

५००० बळी - २५ दिवसात ( ०८ जून )