शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

जिल्ह्यातील उद्योगचक्र पुन्हा गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:13 IST

सातपूर : जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधिंताची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटही कमी होत आहे. ...

सातपूर : जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधिंताची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटही कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात १२ ते २३ मेपर्यंत लागू असलेला कडक लॉकडाऊन रविवारी (दि.२३) मध्यरात्री १२ वाजेनंतर शिथिल करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योग कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या अटींसह सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार आल्याने सोमवार (दि.२४) जिल्ह्यातील उद्योगांची चाके पुन्हा गतिमान होणार आहेत.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या बारा दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर सोमवार (दि.२४) पासून उद्योगांची चाके पुन्हा एकदा फिरू लागणार असून कोविड-१९ चे सर्व नियम पाळून कामगारांनी आपापल्या पाळीत कामावर हजर राहण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थापनाकडून दिल्या जात आहेत. कोरोना संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीने दि.१२ ते २२ मे दरम्यान लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यापार, व्यवसाय आणि उद्योग ठप्प झाले होते. लॉकडाऊनमध्ये मेडिकल दुकाने, दवाखाने, अन्न प्रक्रिया आणि फर्मास्युटिकल उद्योगांसह अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या होत्या. शिवाय ज्या उद्योजकांना उद्योग सुरू ठेवायचे असतील त्यांनी कारखान्यात अथवा दोन किलोमीटर अंतरावर कामगारांच्या निवासाची आणि येण्या-जण्याची सोय केल्यास त्यांना उद्योग सुरू ठेवता येईल, असे स्पष्ट आदेश बजावण्यात आलेले होते. त्यानुसार महिंद्रा अँड महिंद्रा, टीडीके इपकोस, पांचाल इंजिनिअर्स यासह बहुतांश कारखान्यांनी या निर्देशाचे पालन करीत उत्पादन सुरू ठेवले होते. तर अन्न प्रक्रिया आणि फर्मास्युटिकल आणि अत्यावश्यक सेवेतील उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू होते. आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असताना जिल्ह्यातील उद्योग पुन्हा पूर्ववत सुरू होऊ शकरणार आहे.

आजपासून जिल्ह्यातील उद्योग पूर्ववत

- नाशिक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे असे १२ हजार ८०० उद्योग आहेत. त्यापैकी ३४५१ (२५ टक्के) उद्योग आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्देशानुसार सुरू होते. मात्र, रविवारी (दि.२३) मध्यरात्री १२ वाजेनंतर लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर सोमवारपासून कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून उद्योग सुरू करण्यास जिल्हा व्यवस्थापनाने परवानगी दिल्याने बहुतांश सर्वच उद्योग सुरू होऊ शकणार आहेत.

- सुरुवातीला उद्योगांनी हमीपत्र द्यावे, अशी अट घालण्यात आली होती; परंतु औद्योगिक संघटना आणि उद्योजकांनी हरकत घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही अट शिथिल केली आहे. त्यामुळे आता उद्योग पूर्ववत सुरू करण्यास कोणतीही अडचण राहिलेली नसल्याने सोमवारपासून उद्योगांची चाके पुन्हा गतिमान होणार आहेत. त्यादृष्टीने वेगवेगळ्या कंपनी व्यवस्थापनांकडून कामगारांना सूचित करून आपापल्या शिफ्टमध्ये कामावर येण्यास सांगितले जात आहे.