शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

विश्वात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ

By admin | Updated: September 17, 2015 00:04 IST

हंसदेवाचार्य : जगन्नाथ मंदिरातर्फे साधू-महंतांचा सत्कार

पंचवटी : प्राणी व मानवाचे संरक्षण चीन, अमेरिका, जपान यांसारखे देश करू शकत नाही. प्राणी आणि मानवाचे संरक्षण फक्त भारत देश करतो म्हणूनच संपूर्ण विश्वात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू हंसदेवाचार्य यांनी केले. अहमदाबाद येथील जगन्नाथ मंदिराच्या वतीने साधुग्राममध्ये तीन अनि आखाडा व खालशाच्या महंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास होते. व्यासपीठावर निर्वाणीचे महंत धरमदास, निर्माेहीचे महंत राजेंद्रदास, चतु:संप्रदायचे बर्फानीदादा, बृजमोहनदास, रासबिहारीदास आदिंसह साधू-महंत उपस्थित होते. यावेळी बोलताना हंसदेवाचार्य यांनी सांगितले की, दोन सिंहस्थ पर्वण्या शांततेत पार पडल्या असून तिसरी पर्वणी शांततेत होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले. महंत फुलडौलदास यांनी सर्वत्र चांगला संदेश देणारा देश म्हणून भारत असून भारतात कोणताही जातिभेद पाळला जात नाही असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजन जगन्नाथ मंदिराचे प्रमुख महेंद्रभाई झा, महामण्डलेश्वर दिलीपदास महाराज यांनी केले होते. कार्यक्रमाला रामकमलदास वेदांती, दिगंबरचे महंत कृष्णदास, महामंत्री वैष्णवदास, भक्तिचरणदास, नारायणदास, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे, पोलीस उपआयुक्त अशोक मोराळे, आडगाव पोलीस ठाण्याचे अनिल पवार आदिंसह तीन अनि आखाड्यांचे व खालशांचे साधू-महंत उपस्थित होते. महेंद्राभाई झा, महंत दिलीपदास यांच्या हस्ते साधू-महंतांचा सत्कार करण्यात आला.