शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

इन्सानियत ही हैं धर्म वतन का...

By admin | Updated: May 25, 2017 01:17 IST

नाशिक : दहशतवादाची अनामिक भीती, गोळीबाराचे आवाज आणि केव्हाही सुरू होणारी दगडफेक... अंगावर शहारे आणणारे हे चित्र काश्मिरेतर नागरिकांच्या मनामनात ठासलेले..

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दहशतवादाची अनामिक भीती, गोळीबाराचे आवाज आणि केव्हाही सुरू होणारी दगडफेक... अंगावर शहारे आणणारे हे चित्र काश्मिरेतर नागरिकांच्या मनामनात ठासलेले... परंतु तेथे सारे चित्रच वेगळे... बर्फाच्छादित डोंगरांच्या कुशीत वसलेल्या गावांतील गावकरी वेगळे, अतिथ्यशील आणि माणुसकीला जपणारे महत्त्वाचे म्हणजे याच आपल्याच मुल्काला देश मानणारे... सेवा धर्माचे पालन करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या वैद्यकीय व्यावसायिकांना ही ‘इन्सानियत’ दिसली. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये गेलेल्या अकरा वैद्यकीय पथकाला हा अनुभव आला. धुमसत्या काश्मीरात आपल्याच देशबांधवांकडून मायेचा ओलावा निर्माण करावा यासाठी या संस्थेच्या माध्यमातून अशाप्रकारचे प्रयत्न केले जातात. काश्मीरच्या विविध भागांत अगदी पाकिस्तानच्या जवळ असलेल्या भूभागापर्यंत जेथे दुबळी सरकारी यंत्रणा पोहोचत नाही, तेथे देशाच्या अन्य भागातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देण्याची आणि पर्यायाने देशाच्या अन्य भागातील नागरिक आपल्या बरोबरच आहेत याची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने एक वैद्यकीय पथक १० ते २० मे च्या दरम्यान जाऊन आले. यात वणी येथील डॉ. मधुकर आचार्य, डॉ. अस्मिता आचार्य, डॉ. रामदास भोई व डॉ. सुवर्णा भोई, डॉ. सुदेश बोरा व डॉ. रोशनी बोरा, डॉ. सतीश भांबरे, जळगाव येथील डॉ. धर्मेंद्र पाटील तसेच बॉर्डरलेस फाउंडेशनचे ऋषिकेश परमार यांचा प्रामुख्याने यात समावेश होता. तेथील वसतिगृहात राहणे आणि ग्रामस्थांबरोबरच नाश्ता, भोजन करताना या पथकाने तेथील अंतरंग जाणून घेतल्यानंतर त्यांना काश्मीर बाहेर भासवले जाणारे हे चित्रच चुकीचे असल्याचे दिसले. देशाशी निष्ठावान असलेले नागरिक बेरोजगारी आणि अल्प शिक्षणाने पीडित आहेत. पर्यटन हे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असल्याने पर्यटनावर अवलंबून राहतात. त्यामुळेच येथे येणारे अन्य राज्यातील नागरिक आणि पर्यटकांना कधीही ते दुखावत नाहीत.  सैन्य किंवा स्थानिक पोलिसांच्या कारवाईला विरोध करणारे नागरिकही मोजकेच आहेत. अन्य नागरिकांना आता अशा घटनांची सवय झाली आहे. काश्मिरी नागरिक सेवेसाठी आलेल्या नागरिकांविषयी कृतज्ञताच व्यक्त करतात. त्यांनाही शांतता हवी असल्याचे मनही ते मोकळे करतात. अर्थात, सर्वच काही आलबेल आहे, अशी स्थिती नाही तर काही ठिकाणी अतिरेक्यांना शोधण्यासाठी झालेली कारवाई आणि त्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांनी पोलीस आणि सैन्यावर केलेली दगडफेक असे अनुभवही घेतले.