शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

भाम, कडवा धरणात पाणीसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:14 IST

इगतपुरी तालुक्यात सहा मोठे प्रकल्प हे नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत असून वैतरणा धरण हे मुंबई महानगरपालिकेचे आहे. दारणा धरणात जलसंपदा ...

इगतपुरी तालुक्यात सहा मोठे प्रकल्प हे नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत असून वैतरणा धरण हे मुंबई महानगरपालिकेचे आहे. दारणा धरणात जलसंपदा विभागाच्या धोरणानुसार ७८ टक्के जलसाठा स्थिर ठेवून उर्वरित पाणी विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर भावली हे धरणही ओव्हरफ्लो झाल्याने आता याही धरणातून दारणापात्रात विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील भाम धरणात आजस्थितीत झपाट्याने वाढ झाली आहे. हे धरण ७७.७५ टक्के भरले आहे तर कडवा धरणात ६० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. तर मुकणे धरणातही ४८.२९ टक्के तर वाकी धरणात अवघा ३९.७७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. अप्पर वैतरणा धरणात ६८ टक्के साठा उपलब्ध झाला आहे.

दारणा धरणातून ५५४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून भावली धरणातूनही २९० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इगतपुरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अद्यापही पावसाच्या सरी कोसळत आहेत.

---------------------------

इन्फो

धरणांचा आजचा उपलब्ध साठा

दारणा - ७७.७५ टक्के

भावली - १०० टक्के

भाम - ७२.७१ टक्के

कडवा - ६० टक्के

मुकणे - ४८.२९

वाकी - ३९.७७

अप्पर वैतरणा - ६८ टक्के