शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याच्या लागवडीत वाढ, मात्र दराअभावी आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:19 IST

भगवान गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्क दिंडोरी : तालुक्यात खरीप पिकांचे प्रमाण दरवर्षी कमी होत असून, फळबाग व भाजीपाल्याची लागवड ...

भगवान गायकवाड

लोकमत न्यूज नेटवर्क

दिंडोरी : तालुक्यात खरीप पिकांचे प्रमाण दरवर्षी कमी होत असून, फळबाग व भाजीपाल्याची लागवड वाढली असताना यंदा मात्र पूर्वहंगामी टोमॅटोसह सर्व भाजीपाला पिकांना भाव नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनाचे गणित कोलमडले आहे. आता भाजीपाल्याच्या दुसऱ्या हंगामात सोयाबीन, ऊस आणि द्राक्ष पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे.

यंदा पावसाने ओढ दिल्याने भात लागवड उशिरा झाली. यंदा सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाला असला तरी पिके मात्र अत्यंत जोमदार आहेत. दरवर्षी खरीप पिकांची लागवड कमी होत असून, भाजीपाला लागवड वाढत आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत टोमॅटो पिकाची लागवड वाढली आहे. तालुक्यात टोमॅटो व भाजीपाल्याचे दोन हंगाम घेतले जातात. त्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला एक, तर दुसऱ्या हंगामाची लागवड नागपंचमी, पोळा दरम्यान केली जाते. यंदा पहिल्या हंगामातील टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची आदी भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला गेला. मात्र, भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तालुक्यात टोमॅटोवर प्रक्रिया करणारे तीन - चार उद्योग आहेत. मात्र, टोमॅटोला कमी भाव मिळत असल्याने हे प्रकल्प शेतकऱ्यांना फायदेशीर ठरताना दिसत नाहीत.

तालुक्यात पूर्वी ज्वारी, बाजरीचे मोठे पीक घेतले जात होते. मात्र, आता ज्वारी, बाजरी जवळपास नामशेष झाली. त्याची जागा आता मका व सोयाबीनने घेतली आहे. दिंडोरी तालुक्यात सुमारे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झालेली आहे, तर मक्याचे क्षेत्र काहीसे घटले असून, मक्यावरील रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी अन्य पिकाकडे वळत आहेत. भुईमूग हे पीक ही मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे तालुक्याच्या पश्चिम भागात भात, नागली, वरीची मोठ्या प्रमाणात लागवड होत असून, सुमारे ४,५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. कृषी विभागातर्फे एक रेषेत अत्याधुनिक भात लागवड पीक जोपासना पद्धतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. तालुक्यात ३२९ लाभार्थींनी पीक विमा काढला आहे. टोमॅटो, भाजीपाला पिकांना भाव मिळत नाही. तसेच द्राक्ष शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. मात्र, उत्पादन कमी होत असल्याने

तालुक्यात उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उसाकडे कल वाढू लागला आहे. आडसाली उसाची लागवड वाढत आहे. गतवर्षीपेक्षा ऊस लागवड व उसाचे एकरी उत्पादन वाढले आहे. सुमारे १० हजार हेक्टरवर विविध भाजीपाला पीक घेतले जात आहे. यंदा कमी पाऊस झाला असला तरी पिके मात्र जोमदार आहेत.

गेल्या पाच - सहा दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने वाघाड धरण भरण्याच्या मार्गावर आहे. इतर धरणांमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे. सुमारे १८,५०० हेक्टरवर द्राक्ष पिकांची लागवड आहे. द्राक्ष छाटणीचा हंगाम सुरू होत असून, शेतकऱ्यांची पूर्वतयारीची कामे जोरात सुरु आहेत. दरवर्षी द्राक्ष छाटणी हंगामात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने द्राक्ष उत्पादन खर्च वाढत आहे. यंदा सर्व पिके जोमदार असली तरी पहिल्या हंगामातील टोमॅटो भाजीपाल्याने निराशा केली आहे. दुसऱ्या टप्प्यातील भाजीपाला पिकांना भाव मिळण्याची, सोयाबीन भात पिकाचे अधिक उत्पादन येण्याची, द्राक्ष हंगाम कमी खर्चात येत चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेवर शेतकऱ्यांचे पीक संवर्धनाचे काम जोमात सुरू आहे.

कोट...

नाशिक जिल्ह्यात शेतकरी भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवत आहे. परंतु बाजार भाव कोसळल्याने उत्पादन खर्च निघत नाही. द्राक्षांचा खर्च परवडत नाही. यामुळे शेतकरी आता भाजीपालावर्गीय फळपिके घेऊ लागला आहे. त्यात खासकरून कोबी, टोमॅटो, शिमला मिरची, साधी तिखट मिरची, कलिंगड, गिलके, कारले, कोथिंबीर, खरबूज, फ्लाॅवर अशी पिके घेत आहेत. या भाजीपाल्याला बाजारभाव मिळाला नाही तर बॅंकांचे कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

- सोमनाथ मुळाणे, प्रगतशील शेतकरी, खतवड

140921\14nsk_50_14092021_13.jpg

सोयाबीन पीक