शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याच्या लागवडीत वाढ, मात्र दराअभावी आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:19 IST

भगवान गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्क दिंडोरी : तालुक्यात खरीप पिकांचे प्रमाण दरवर्षी कमी होत असून, फळबाग व भाजीपाल्याची लागवड ...

भगवान गायकवाड

लोकमत न्यूज नेटवर्क

दिंडोरी : तालुक्यात खरीप पिकांचे प्रमाण दरवर्षी कमी होत असून, फळबाग व भाजीपाल्याची लागवड वाढली असताना यंदा मात्र पूर्वहंगामी टोमॅटोसह सर्व भाजीपाला पिकांना भाव नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनाचे गणित कोलमडले आहे. आता भाजीपाल्याच्या दुसऱ्या हंगामात सोयाबीन, ऊस आणि द्राक्ष पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे.

यंदा पावसाने ओढ दिल्याने भात लागवड उशिरा झाली. यंदा सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाला असला तरी पिके मात्र अत्यंत जोमदार आहेत. दरवर्षी खरीप पिकांची लागवड कमी होत असून, भाजीपाला लागवड वाढत आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत टोमॅटो पिकाची लागवड वाढली आहे. तालुक्यात टोमॅटो व भाजीपाल्याचे दोन हंगाम घेतले जातात. त्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला एक, तर दुसऱ्या हंगामाची लागवड नागपंचमी, पोळा दरम्यान केली जाते. यंदा पहिल्या हंगामातील टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची आदी भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला गेला. मात्र, भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तालुक्यात टोमॅटोवर प्रक्रिया करणारे तीन - चार उद्योग आहेत. मात्र, टोमॅटोला कमी भाव मिळत असल्याने हे प्रकल्प शेतकऱ्यांना फायदेशीर ठरताना दिसत नाहीत.

तालुक्यात पूर्वी ज्वारी, बाजरीचे मोठे पीक घेतले जात होते. मात्र, आता ज्वारी, बाजरी जवळपास नामशेष झाली. त्याची जागा आता मका व सोयाबीनने घेतली आहे. दिंडोरी तालुक्यात सुमारे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झालेली आहे, तर मक्याचे क्षेत्र काहीसे घटले असून, मक्यावरील रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी अन्य पिकाकडे वळत आहेत. भुईमूग हे पीक ही मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे तालुक्याच्या पश्चिम भागात भात, नागली, वरीची मोठ्या प्रमाणात लागवड होत असून, सुमारे ४,५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. कृषी विभागातर्फे एक रेषेत अत्याधुनिक भात लागवड पीक जोपासना पद्धतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. तालुक्यात ३२९ लाभार्थींनी पीक विमा काढला आहे. टोमॅटो, भाजीपाला पिकांना भाव मिळत नाही. तसेच द्राक्ष शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. मात्र, उत्पादन कमी होत असल्याने

तालुक्यात उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उसाकडे कल वाढू लागला आहे. आडसाली उसाची लागवड वाढत आहे. गतवर्षीपेक्षा ऊस लागवड व उसाचे एकरी उत्पादन वाढले आहे. सुमारे १० हजार हेक्टरवर विविध भाजीपाला पीक घेतले जात आहे. यंदा कमी पाऊस झाला असला तरी पिके मात्र जोमदार आहेत.

गेल्या पाच - सहा दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने वाघाड धरण भरण्याच्या मार्गावर आहे. इतर धरणांमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे. सुमारे १८,५०० हेक्टरवर द्राक्ष पिकांची लागवड आहे. द्राक्ष छाटणीचा हंगाम सुरू होत असून, शेतकऱ्यांची पूर्वतयारीची कामे जोरात सुरु आहेत. दरवर्षी द्राक्ष छाटणी हंगामात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने द्राक्ष उत्पादन खर्च वाढत आहे. यंदा सर्व पिके जोमदार असली तरी पहिल्या हंगामातील टोमॅटो भाजीपाल्याने निराशा केली आहे. दुसऱ्या टप्प्यातील भाजीपाला पिकांना भाव मिळण्याची, सोयाबीन भात पिकाचे अधिक उत्पादन येण्याची, द्राक्ष हंगाम कमी खर्चात येत चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेवर शेतकऱ्यांचे पीक संवर्धनाचे काम जोमात सुरू आहे.

कोट...

नाशिक जिल्ह्यात शेतकरी भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवत आहे. परंतु बाजार भाव कोसळल्याने उत्पादन खर्च निघत नाही. द्राक्षांचा खर्च परवडत नाही. यामुळे शेतकरी आता भाजीपालावर्गीय फळपिके घेऊ लागला आहे. त्यात खासकरून कोबी, टोमॅटो, शिमला मिरची, साधी तिखट मिरची, कलिंगड, गिलके, कारले, कोथिंबीर, खरबूज, फ्लाॅवर अशी पिके घेत आहेत. या भाजीपाल्याला बाजारभाव मिळाला नाही तर बॅंकांचे कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

- सोमनाथ मुळाणे, प्रगतशील शेतकरी, खतवड

140921\14nsk_50_14092021_13.jpg

सोयाबीन पीक