शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

भाजीपाल्याच्या लागवडीत वाढ, मात्र दराअभावी आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:19 IST

भगवान गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्क दिंडोरी : तालुक्यात खरीप पिकांचे प्रमाण दरवर्षी कमी होत असून, फळबाग व भाजीपाल्याची लागवड ...

भगवान गायकवाड

लोकमत न्यूज नेटवर्क

दिंडोरी : तालुक्यात खरीप पिकांचे प्रमाण दरवर्षी कमी होत असून, फळबाग व भाजीपाल्याची लागवड वाढली असताना यंदा मात्र पूर्वहंगामी टोमॅटोसह सर्व भाजीपाला पिकांना भाव नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनाचे गणित कोलमडले आहे. आता भाजीपाल्याच्या दुसऱ्या हंगामात सोयाबीन, ऊस आणि द्राक्ष पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे.

यंदा पावसाने ओढ दिल्याने भात लागवड उशिरा झाली. यंदा सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाला असला तरी पिके मात्र अत्यंत जोमदार आहेत. दरवर्षी खरीप पिकांची लागवड कमी होत असून, भाजीपाला लागवड वाढत आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत टोमॅटो पिकाची लागवड वाढली आहे. तालुक्यात टोमॅटो व भाजीपाल्याचे दोन हंगाम घेतले जातात. त्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला एक, तर दुसऱ्या हंगामाची लागवड नागपंचमी, पोळा दरम्यान केली जाते. यंदा पहिल्या हंगामातील टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची आदी भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला गेला. मात्र, भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तालुक्यात टोमॅटोवर प्रक्रिया करणारे तीन - चार उद्योग आहेत. मात्र, टोमॅटोला कमी भाव मिळत असल्याने हे प्रकल्प शेतकऱ्यांना फायदेशीर ठरताना दिसत नाहीत.

तालुक्यात पूर्वी ज्वारी, बाजरीचे मोठे पीक घेतले जात होते. मात्र, आता ज्वारी, बाजरी जवळपास नामशेष झाली. त्याची जागा आता मका व सोयाबीनने घेतली आहे. दिंडोरी तालुक्यात सुमारे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झालेली आहे, तर मक्याचे क्षेत्र काहीसे घटले असून, मक्यावरील रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी अन्य पिकाकडे वळत आहेत. भुईमूग हे पीक ही मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे तालुक्याच्या पश्चिम भागात भात, नागली, वरीची मोठ्या प्रमाणात लागवड होत असून, सुमारे ४,५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. कृषी विभागातर्फे एक रेषेत अत्याधुनिक भात लागवड पीक जोपासना पद्धतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. तालुक्यात ३२९ लाभार्थींनी पीक विमा काढला आहे. टोमॅटो, भाजीपाला पिकांना भाव मिळत नाही. तसेच द्राक्ष शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. मात्र, उत्पादन कमी होत असल्याने

तालुक्यात उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उसाकडे कल वाढू लागला आहे. आडसाली उसाची लागवड वाढत आहे. गतवर्षीपेक्षा ऊस लागवड व उसाचे एकरी उत्पादन वाढले आहे. सुमारे १० हजार हेक्टरवर विविध भाजीपाला पीक घेतले जात आहे. यंदा कमी पाऊस झाला असला तरी पिके मात्र जोमदार आहेत.

गेल्या पाच - सहा दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने वाघाड धरण भरण्याच्या मार्गावर आहे. इतर धरणांमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे. सुमारे १८,५०० हेक्टरवर द्राक्ष पिकांची लागवड आहे. द्राक्ष छाटणीचा हंगाम सुरू होत असून, शेतकऱ्यांची पूर्वतयारीची कामे जोरात सुरु आहेत. दरवर्षी द्राक्ष छाटणी हंगामात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने द्राक्ष उत्पादन खर्च वाढत आहे. यंदा सर्व पिके जोमदार असली तरी पहिल्या हंगामातील टोमॅटो भाजीपाल्याने निराशा केली आहे. दुसऱ्या टप्प्यातील भाजीपाला पिकांना भाव मिळण्याची, सोयाबीन भात पिकाचे अधिक उत्पादन येण्याची, द्राक्ष हंगाम कमी खर्चात येत चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेवर शेतकऱ्यांचे पीक संवर्धनाचे काम जोमात सुरू आहे.

कोट...

नाशिक जिल्ह्यात शेतकरी भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवत आहे. परंतु बाजार भाव कोसळल्याने उत्पादन खर्च निघत नाही. द्राक्षांचा खर्च परवडत नाही. यामुळे शेतकरी आता भाजीपालावर्गीय फळपिके घेऊ लागला आहे. त्यात खासकरून कोबी, टोमॅटो, शिमला मिरची, साधी तिखट मिरची, कलिंगड, गिलके, कारले, कोथिंबीर, खरबूज, फ्लाॅवर अशी पिके घेत आहेत. या भाजीपाल्याला बाजारभाव मिळाला नाही तर बॅंकांचे कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

- सोमनाथ मुळाणे, प्रगतशील शेतकरी, खतवड

140921\14nsk_50_14092021_13.jpg

सोयाबीन पीक