शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

सिन्नरच्या पूर्व भागात कापूस क्षेत्रात वाढ

By admin | Updated: September 7, 2014 00:13 IST

सिन्नरच्या पूर्व भागात कापूस क्षेत्रात वाढ

सिन्नर : तालुक्यात तब्बल दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाले आहे. त्यातही पश्चिम भागात चांगला पाऊस, तर पूर्व भागात केवळ रिमझिम पाऊस झाला. उशिराच्या पावसामुळे कमी पाण्यावर तग धरून येणारे मूळ मराठवाड्यातील असेलेले कापूस पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागात वाढ झाली आहे. मात्र शेतकऱ्यांना यंदा कडधान्य पिकांना मुकावे लागणार असल्याचे चिन्ह आहे. तालुक्यात खरीप हंगामात ६४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पिकांच्या पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र अद्याप या उद्दिष्टापर्यंत पोहोचता आले नाही. मात्र सुमारे ५० टक्क्यांच्या जवळपास पेरण्या झाल्या आहेत. रिमझिम पावसावर ही पिके तरारली आहे. मात्र अधिक पाणी लागणाऱ्या पिकांपेक्षा कमी पाण्यावर तग धरून राहणाऱ्या कापूस पिकाच्या पेरणीचे उद्दिष्ट एक हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर ठेवण्यात आले होते किंबहुना त्यापेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आल्याचे दिसून येत आहे. पूर्वभागात कपाशीचे क्षेत्र वाढले असून, कडधान्य, मका व सोयाबीनच्या क्षेत्रात घट झाली आहे. खरीप हंगामातील तृणधान्य पिकांमधील बाजरी, मका, खरीप ज्वारी व नागली यौपकी बाजरी व मका पिकांची पेरणी १५ ते २० जुलै कालावधीपर्यंत करणे आवश्यक होते. मात्र या पिकांच्या लागवडीलाही उशीर झाला आहे. मात्र ही पिके सध्या चांगली आली असून, त्यांना खतांची गरज आहे. मात्र खते मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे या पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे.सपाटून पाऊस झाल्यास भाजीपालावर्गीय व नगदी पिकांतून उत्पादन वाढीसाठी शेतकरी प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पूर्व भागातील सर्वच जलस्रोत ठणठणीत कोरडे असल्याने यापुढेही पावसामध्ये सातत्य राहिले तरच या पिकांचे उत्पादन हाती लागेल अन्यथा यंदाचा खरीप हंगामही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनाप्रमाणे यंदा तृणधान्य पिकांतील बाजरी पिकाच्या पेरणीचा २० हजार २५० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट असून, मका १९ हजार २५०, सोयाबीन-आठ हजार क्षेत्राचे उद्दिष्ट होते. तथापि, या पिकांची पेरणी १५ ते २० जुलैपर्यंत झाली असती तर हे उद्दिष्ट पूर्ण झाले असते. मात्र पेरणी उशिरा झाल्याने उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकले नाहीत. मात्र भूईमुग- चार हजार १५०, खरीप ज्वारी ५०० हेक्टर, नागली ५० उद्दिष्ट गाठू शकण्याची शक्यता आहे. परंतु कडधान्य वर्गातील तूर, मूग, मठ व कुळीद यांचे प्रत्येकी एक हजार ५०० हेक्टर तर सूर्यफूल, खुरासणी या तेलबिया वर्गातील पिकंचे प्रत्येकी १०० हेक्टर, ऊस- ८५० हेक्टर क्षेत्रावर उद्दिष्ट होते. त्यापैकी कडधान्य वर्गातील पिकांची लागवड अत्यल्प क्षेत्रावरच झाली आहे. (वार्ताहर)