शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सिन्नरच्या पूर्व भागात कापूस क्षेत्रात वाढ

By admin | Updated: September 7, 2014 00:13 IST

सिन्नरच्या पूर्व भागात कापूस क्षेत्रात वाढ

सिन्नर : तालुक्यात तब्बल दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाले आहे. त्यातही पश्चिम भागात चांगला पाऊस, तर पूर्व भागात केवळ रिमझिम पाऊस झाला. उशिराच्या पावसामुळे कमी पाण्यावर तग धरून येणारे मूळ मराठवाड्यातील असेलेले कापूस पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागात वाढ झाली आहे. मात्र शेतकऱ्यांना यंदा कडधान्य पिकांना मुकावे लागणार असल्याचे चिन्ह आहे. तालुक्यात खरीप हंगामात ६४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पिकांच्या पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र अद्याप या उद्दिष्टापर्यंत पोहोचता आले नाही. मात्र सुमारे ५० टक्क्यांच्या जवळपास पेरण्या झाल्या आहेत. रिमझिम पावसावर ही पिके तरारली आहे. मात्र अधिक पाणी लागणाऱ्या पिकांपेक्षा कमी पाण्यावर तग धरून राहणाऱ्या कापूस पिकाच्या पेरणीचे उद्दिष्ट एक हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर ठेवण्यात आले होते किंबहुना त्यापेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आल्याचे दिसून येत आहे. पूर्वभागात कपाशीचे क्षेत्र वाढले असून, कडधान्य, मका व सोयाबीनच्या क्षेत्रात घट झाली आहे. खरीप हंगामातील तृणधान्य पिकांमधील बाजरी, मका, खरीप ज्वारी व नागली यौपकी बाजरी व मका पिकांची पेरणी १५ ते २० जुलै कालावधीपर्यंत करणे आवश्यक होते. मात्र या पिकांच्या लागवडीलाही उशीर झाला आहे. मात्र ही पिके सध्या चांगली आली असून, त्यांना खतांची गरज आहे. मात्र खते मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे या पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे.सपाटून पाऊस झाल्यास भाजीपालावर्गीय व नगदी पिकांतून उत्पादन वाढीसाठी शेतकरी प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पूर्व भागातील सर्वच जलस्रोत ठणठणीत कोरडे असल्याने यापुढेही पावसामध्ये सातत्य राहिले तरच या पिकांचे उत्पादन हाती लागेल अन्यथा यंदाचा खरीप हंगामही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनाप्रमाणे यंदा तृणधान्य पिकांतील बाजरी पिकाच्या पेरणीचा २० हजार २५० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट असून, मका १९ हजार २५०, सोयाबीन-आठ हजार क्षेत्राचे उद्दिष्ट होते. तथापि, या पिकांची पेरणी १५ ते २० जुलैपर्यंत झाली असती तर हे उद्दिष्ट पूर्ण झाले असते. मात्र पेरणी उशिरा झाल्याने उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकले नाहीत. मात्र भूईमुग- चार हजार १५०, खरीप ज्वारी ५०० हेक्टर, नागली ५० उद्दिष्ट गाठू शकण्याची शक्यता आहे. परंतु कडधान्य वर्गातील तूर, मूग, मठ व कुळीद यांचे प्रत्येकी एक हजार ५०० हेक्टर तर सूर्यफूल, खुरासणी या तेलबिया वर्गातील पिकंचे प्रत्येकी १०० हेक्टर, ऊस- ८५० हेक्टर क्षेत्रावर उद्दिष्ट होते. त्यापैकी कडधान्य वर्गातील पिकांची लागवड अत्यल्प क्षेत्रावरच झाली आहे. (वार्ताहर)