शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

पाणी बंदमुळे ‘पंचवटीकरांची’ गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 23:58 IST

नागरिकांनी केला पाण्याचा साठा : टँकरची व्यवस्था करण्याची मागणी

 पंचवटी : गंगापूर धरणातील जलसाठा कमी झाल्याच्या कारणावरून नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज संपूर्ण पंचवटी परिसरात पाणीपुरवठा बंद ठेवल्याने पंचवटीकरांची गैरसोय झाली. नळाला पाणी आलेच नसल्याने नागरिकांनी जरा जपूनच पाणी वापरले. विशेष म्हणजे गुरुवारच्या दिवशी पंचवटीत पाणीपुरवठा होणार नसल्याने काही लोकप्रतिनिधींनी ज्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, त्याभागात बुधवारीच स्वखर्चाने पाण्याचे टॅँकर पाठविण्याची व्यवस्था केली होती. पंचवटीत संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी बुधवारच्या दिवशी घरातील हंडा, कळशी, मोठे पिंप, प्लास्टिक टब पाण्याने भरून ठेवले होते. पंचवटीतील हिरावाडीरोड तसेच हिरावाडी परिसरात काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत असल्याने हिरावाडीत गुरुवारी गुंजाळबाबानगर, भगवतीनगर व शिवकृपानगर या भागात खासगी टॅँकरने पाणीपुरवठा केल्याचे नगरसेवक रूची कुंभारकर यांनी सांगितले, तर हिरावाडीरोडवरील दामोदरनगर भागात बुधवारीच पाण्याचे टॅँकर पाठवून नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिल्याचे नगरसेवक समाधान जाधव, रूपाली गावंड यांनी सांगितले. गुरुवारच्या दिवशी संपूर्ण पंचवटीत पाणीपुरवठा होणार नसल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्याने नागरिकांनी पाण्याचा साठा करून पाणी जरा जपूनच वापरले. कामानिमित्ताने सकाळच्यावेळी घराबाहेर पडलेल्या नोकरदार गृिहणींची तसेच मोलमजुरांची गैरसोय निर्माण झाली होती. बुधवारीच पाण्याचा साठा करून ठेवला असला तरी दोन दिवस पाणी पुरविणे शक्य न झाल्याने काहींनी उसनवार म्हणून शेजारी राहणाऱ्यांकडूनही हंडाभर पिण्याचे पाणी घेतल्याचे बोलून दाखविले. (वार्ताहर)