शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी पर्यटन करताहेत...सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:37 IST

नाशिक : हिरवाईने नटलेली डोंगररांग...सृष्टीने पांघरलेला हिरवा शालू... गर्द हिरवाईतून खळाळणारे धबधबे... थंड वारा अन् पाऊसधारा अशा निसर्गरम्य वातावरणाची मोहिनी पडणे स्वाभाविक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : हिरवाईने नटलेली डोंगररांग...सृष्टीने पांघरलेला हिरवा शालू... गर्द हिरवाईतून खळाळणारे धबधबे... थंड वारा अन् पाऊसधारा अशा निसर्गरम्य वातावरणाची मोहिनी पडणे स्वाभाविक आहे. ‘वीकेण्ड’ला पर्यटनाला जाताना सावधानता बाळगून सुरक्षितता राखण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागासह पर्यटन विकास महामंडळाने केले आहे.  जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यासह त्र्यंबकेश्वर, वणी, निफाड, पेठ अशा सर्वच भागांमध्ये मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे परिसर हिरवाईने नटला असून, सह्याद्रीच्या डोंगररांगेवरून धबधबे खळाळत आहेत. आजूबाजूच्या भात शेतीची खाचरे पाण्याने तुडूंब भरली आहेत.  परिसरात पावसाळी सहलीसाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. भावलीच्या गायवझरा, सुपवझरा या मोठ्या धबधब्यांसह अन्य लहान-मोठ्या धबधब्यांनी पर्यटकांना मोहिनी घातली आहे. शहरापासून ४० ते ५० किलोमीटर असलेल्या भावली परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्याचप्रमाणे अंजनेरी ते त्र्यंबकेश्वर व पहिणे, पेगलवाडी परिसरांतही गर्दी वाढत आहे. रविवारी (दि.२२) पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असून, पर्यटकांची गर्दीदेखील वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आषाढ अमावास्या असल्यामुळे तळीरामांकडून ओल्या पार्ट्या रंगविल्या जाण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस, पर्यटन विभागाने ‘अलर्ट’ जारी केला आहे.निसर्ग सौंदर्याला अस्वच्छतेचा ‘डाग’ निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण या परिसरावर केली असली तरी या नैसर्गिक सौंदर्याला काही पर्यटक बेभानपणे वागून ‘डाग’ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पर्यटकांकडून अस्वच्छता पसरविली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी प्लॅस्टिकच्या बाटल्या, ग्लास, कॅरिबॅगचा कचरा पहावयास मिळतो. मद्यपींकडून फोडण्यात आलेल्या मद्याच्या बाटल्यांच्या काचाही विखुरलेल्या दिसतात. पर्यावरणाला घातक असे प्रकार टाळण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे.