शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

उत्तम आहारावरच प्रतिकारशक्ती अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:12 IST

नाशिक : आयुर्वेदात प्रत्येक ऋतूप्रमाणे दिनचर्या आणि आहाराची जोड देण्यात आली आहे. कारण आहारावरच आपली रोगप्रतिकारशक्ती अवलंबून असल्याचे मत ...

नाशिक : आयुर्वेदात प्रत्येक ऋतूप्रमाणे दिनचर्या आणि आहाराची जोड देण्यात आली आहे. कारण आहारावरच आपली रोगप्रतिकारशक्ती अवलंबून असल्याचे मत आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. विक्रांत जाधव यांनी व्यक्त केले.

डिजिटल वसंत व्याख्यानमालेत त्यांनी 'ऋतुमान आणि आहार' या विषयावर सोळावे पुष्प वैद्य डॉ. जाधव यांनी गुंफले. वसंतराव नेवासकर स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानात डॉ. जाधव यांनी, कोरोना परिस्थिती, प्रत्येक ऋतूचे मानवी जीवनाशी निगडित असलेले महत्त्व, आहार आणि विहार आदी मुद्द्‌यांचा परामर्श घेतला.

प्रत्येक ऋतूचा प्रभाव आरोग्यावर होत असतो. ऋतूबदल होत असताना आहाराचे परिणामही बदलतात आणि रोगप्रतिकारक्षमतेस हे ऋतू कारणीभूत ठरतात. वसंत ऋतूमध्येच कोविडने जन्म घेतला. हिवाळ्यात शारीरिक बल उत्तम असते, ते बल सहाही ऋतूत निरोगी राहण्यासाठी क्षमता देते. मात्र या वातावरणात कफवर्धक आहार टाळायला हवा, असा सल्ला डॉ. जाधव यांनी दिला.

पालेभाज्या संख्यात्मकदृष्ट्या कॅलरीज्‌ वाढवतात, मांसाहाराचे गुणधर्म वसंत ऋतूत शरीराला लागू होत नाहीत, पण भात मात्र बलकारक ठरतो, असेही जाधव यांनी सांगितले. ग्रीष्म ऋतूमध्ये फळांचा वापर वाढवावा, कोकमही पाचक असते, तर नारळपाणी बल आणि शीतलता देते. मसाल्यांध्येही हीच गुणवैशिष्ट्ये असल्याचे नमूद करून डॉ. जाधव यांनी मांस जड असल्याने ते टाळायला हवे, असेही स्पष्ट केले. कोविडच्या परिस्थितीत शरीरप्रकृती उत्तम ठेवावी. पावसाळ्यात रानभाज्या कटाक्षाने खाव्यात. कडधान्यांचा आहारात वापर असावा. उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊ नये. हा पदार्थ जड असल्याने शास्त्रकारांना हे अभिप्रेत नसल्याचे मत डॉ. जाधव यांनी नोंदविले.

यावेळी बांधकाम व्यावसायिक अरुण नेवासकर उपस्थित होते. याप्रसंगी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर आभार चिटणीस संगीता बाफना यांनी मानले.

----------------------------

आजचे व्याख्यान

वक्ते : डॉ. डी. एल. कऱ्हाड

विषय : कामगार आणि नोकरदारांपुढील आव्हाने

------------

फोटो

१६डॉ. जाधव