शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएमए’चा मिक्सोपॅथीला विरोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:40 IST

नाशिक : आयुर्वेद हे आपल्या देशातील शास्त्र असून, त्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. किंबहुना आयुर्वेदात अधिकाधिक संशोधन होण्याची आवश्यकता ...

नाशिक : आयुर्वेद हे आपल्या देशातील शास्त्र असून, त्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. किंबहुना आयुर्वेदात अधिकाधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे; मात्र त्याबाबत काहीही न करता अचानक आयुर्वेदाचाऱ्यांना ६८ शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याचा निर्णय सेंट्रल काैन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनकडून (सीसीआय) घेण्यात आला. अशा मिक्सोपॅथीला आमचा विरोध असल्यानेच आयएमएने शुक्रवारी एक दिवसाचा लाक्षणिक संपाचा निर्णय घेतला असल्याचे नाशिक आयएमएचे अध्यक्ष डाॅ. समीर चंद्रात्रे यांनी सांगितले. या संपातही आयएमएच्यावतीने इमर्जन्सी रुग्ण तसेच कोविड रुग्णांच्या उपचारांची सुविधा कायम ठेवली जाणार आहे; मात्र या निर्णयाला त्यांचा विरोध असल्याचे शासनाला समजावे, यासाठीच या लाक्षणिक संपाचे आयोजन करण्यात आले असल्याचेदेखील डॉ. चंद्रात्रे यांनी सांगितले. या संपाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्र. आयुर्वेदाच्या पदव्युत्तर पदवीधारकांना शस्त्रक्रियेबाबतची मान्यता देण्यास आयएमएचा विरोध का?

डॉ. चंद्रात्रे - आयुर्वेद ही स्वतंत्र प्रणाली असून, त्यांच्या अभ्यासक्रमात त्यांना मॉडर्न सायन्सबाबत तितकेसे सखोल ज्ञान दिले जात नाही. मान्यता दिलेल्या शस्त्रक्रियांसाठी त्यांचे पुरेसे प्रशिक्षणदेखील झालेले नसते. त्यामुळे अशी सरमिसळ केली जाऊ नये, इतकेच आमचे म्हणणे आहे.

प्र. आयुर्वेदासारख्या स्वदेशी पॅथीला या निर्णयामुळे चालना मिळणार असेल तर आक्षेप कशासाठी ?

डॉ. चंद्रात्रे - आयुर्वेदाला या निर्णयाने कोणताच फायदा होणार नसून, उलट विदेशांमध्ये ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिकच्या पदवीधारकांचे भिन्न महत्त्व उरणार नाही. आयुर्वेद करणाऱ्यांना पूर्णपणे शुद्ध आयुर्वेदाचे उपचार आणि शास्त्र अनुसरुन द्यावे तर मॉडर्न सायन्सला त्यांचे ॲलोपॅथीचे शास्त्र कायम ठेवू द्यावे. त्यात खिचडी करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये, दोघांचे स्पेशलायझेशन स्वतंत्र ठेवून त्या दोन्ही शास्त्रांना वाढण्याची संधी कायम ठेवायला हवी, असेच आमचे म्हणणे आहे.

प्र. या निर्णयाऐवजी मग सीसीआयने काय करायला हवे होते, असे तुम्हाला वाटते?

डॉ. चंद्रात्रे - आयुर्वेदाचा आम्ही आदरच करतो; पण त्यात अधिकाधिक संशोधन होण्याची आवश्यकता असून, या मूलभूत गोष्टींमध्ये सीसीआयने लक्ष घालण्याची आवश्यकता होती. किंवा मग आयुर्वेदाला स्वतंत्र ठेवून एखादा नवीन अभ्यासक्रम विकसित करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे शैक्षणिक प्रणालीचा मूळ ढाचा न बदलता सर्व पॅथींना स्वतंत्र ठेवून एकमेकांचा आदर राखून काम व्हायला हवे होते, असे मला वाटते.