शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

...तर जनक्षोभ उसळेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:20 IST

उच्च न्यायालयाच्या नावाखाली पोलीस व महापालिका गणेश मंडळांची अडवणूक करून गणेशभक्तांवर गुन्हे दाखल करीत आहे. हिंदू सणांच्या बाबतीत केला जाणारा अतिरेक वेळीच थांबवा अन्यथा जनक्षोभ उसळेल, असा इशारा शिवसेनेने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

नाशिक : उच्च न्यायालयाच्या नावाखाली पोलीस व महापालिका गणेश मंडळांची अडवणूक करून गणेशभक्तांवर गुन्हे दाखल करीत आहे. हिंदू सणांच्या बाबतीत केला जाणारा अतिरेक वेळीच थांबवा अन्यथा जनक्षोभ उसळेल, असा इशारा शिवसेनेने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.  सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले मंडप नियमांच्या आड दूर करण्याचे काम पोलीस व महापालिकेने सुरू केले असून, त्याबद्दल नाराज गणेशभक्तांना सोबत घेऊन शिवसेनेने मंगळवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, गणेशोत्सवात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होऊन मोठ्या भक्तिभावाने उत्सव साजरे करीत असताना प्रशासनाने यंदा गणेशोत्सवावर जाचक अटी व शर्ती लागू केलेल्या आहेत. मनपा प्रशासनाने गणेशोत्सव मंडळाच्या जागेचे शुल्क मोठ्या प्रमाणावर वाढवलेले आहे व यानंतर जाचक अटी लादून उत्सव साजरा करण्यावर अडथला आणलेला आहे. तपासणी पथकाकडून मंडळांवर दबाव टाकून ध्वनिक्षेपक, मंडप काढण्यावर भर दिला जात आहे. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, श्यामकुमार साबळे, संतोष गायकवाड, चंद्रकांत खाडे, सुदाम डेमसे, रमेश धोंगडे, पूनमताई मगर, प्रवीण तिदमे, प्रशांत दिवे, जयश्री खर्जल, नितीन चिडे, दिगंबर मोगरे, शिवाजी भोर, शरद देवरे, शशिकांत कोठूळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.गुजरातमध्ये गरबा खेळण्यास परवानगी, महाराष्ट्रात मात्र उत्सव अडचणीतकायदेशीर कारवाईच्या धमक्या दिल्या जात असून, ध्वनिक्षेपकाचा आवाज ६५ डेसिबलपर्यंत मर्यादेत ठेवण्याची पद्धत चुकीची आहे. हिंदू संस्कृतीतील प्रत्येक सण व उत्सवाच्या मागे वैज्ञानिक, धार्मिक व सामाजिक बांधिलकी असून, हिंदू सणांच्या बाबतीतच प्रशासनाकडून निर्बंध लादले जात आहेत. उत्तर प्रदेशात कावडी यात्रेच्या संदर्भात तेथील मुख्यमंत्र्यांनी सर्व निर्बंध गुंडाळून ठेवण्याचे आदेश दिले.गुजरातमध्ये गरबा खेळण्यासाठी पहाटे ४ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी दिली जाते, परंतु महाराष्टÑात मात्र हिंदू सण व उत्सवच अडचणीत आणण्याचे काम प्रशासन मुद्दामहून करीत असून, प्रशासनाने नियमांचा बाऊ करून गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करू नये व निर्बंध तत्काळ शिथिल करावे अन्यथा जनक्षोभ निर्माण होऊन त्यास प्रशासन व सरकार जबादार राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.