शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

असा झाला सुरगाणा धान्य घोटाळा जर तहसीलदार नाही तर मग जबाबदार कोण ?

By admin | Updated: May 24, 2015 01:20 IST

असा झाला सुरगाणा धान्य घोटाळा जर तहसीलदार नाही तर मग जबाबदार कोण ?

  नाशिक : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील शीधापत्रिकांची संख्या लक्षात घेऊन पुरवठा खात्याने तालुकानिहाय निर्धारित करुन दिलेला आणि त्यानुसार मनमाड येथील धान्य गोदामातून रवाना केला गेलेला सात तालुक्यांचा धान्यसाठा संबंधित सात तालुक्यांकडे रवाना न होता, तो परस्पर एकाच सुरगाणा तालुक्याकडे नेला गेला आणि तिथेही तो सरकारी गोदामात न जाता परस्पर खुल्या बाजारात विक्रीसाठी पाठविला गेला पण संबंधित सात तहसीलदारांना त्यांच्यासाठी धान्य रवाना झाल्याचे ठाऊक असूनही त्यांनी तो प्राप्त होतो वा नाही याची खबरदारी घेणे टाळले आणि केवळ चार महिन्यात तब्बल ५ कोटी २५ लाख रुपये किंमतीचे ३५० टन धान्य चोरापोरी गेले आणि गरिबांच्या तोंडचा घासदेखील हिरावला गेला. वास्तविक पाहता जिल्हा पुरवठा कार्यालयाने प्रत्येक तालुक्यासाठी कोणत्या निकषांवर किती धान्यसाठा मंजूर करावा आणि त्यापैकी सर्व अथवा अंशत: केव्हां, कधी आणि कसा पाठवावा याची अत्यंत चोख आणि काटेकोर व्यवस्था सरकारनेच तयार करुन दिली आहे. या व्यवस्थेनुसार संबंधित तालुक्याच्या तहसीलदाराला त्याच्या तालुक्यासाठी मंजूर केलेला धान्यसाठा आणि त्यानंतर तो प्रत्यक्षात रवाना केला जातो, तेव्हां सारे काही विगतवार आगाऊ आणि तेही लेखी स्वरुपात कळविले जाते. साहजिकच जिल्हा कार्यालयाकडून प्राप्त ज्ञापनानुसार संबंधित धान्यसाठा स्वीकारणे आणि लगेचच तसे जिल्हा कार्यालयास कळविणे ही संबंधित तहसीलदाराची प्राथमिक जबाबदारी असते. पण या जबाबदारीचे वहन करण्याबाबत जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या तहसीलदारांनी हलगर्जीपणा दाखविला, हे सकृतदर्शनीच सरकारच्या ध्यानात आले. तरीही या तालुक्यांमधील (नाशिक, दिंडोरी, कळवण, पेठ, सिन्नर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर) सरकारी धान्य गोदामांचे एकदा नव्हे, दोनदा परीक्षण केले गेले. सप्टेंबर ते डिसेंबर २०१४ असे चार महिने चाललेली ही लूट जर डिसेंबरातच लक्षात आली नसती तर कदाचित आणखीही काही काळ चालूच राहिली असती, हे उघड आहे. या लुटीमध्ये संबंधित तहसीलदारांचा सक्रीय सहभाग होता अथवा नाही, हे चौकशीअंती स्पष्ट होईलच. पण त्यांच्या हलगर्जीपणापायी घोटाळेबाजांना प्रोत्साहन मिळत गेले, ही बाब निर्विवाद आहे. चौकट=== धान्य वाहतुकीची चोख पद्धत जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून तालुनिहाय मंजूर धान्यसाठ्याच्या चार प्रती तयार होतात. त्या संबंधित तहसीलदार, वाहतूक ठेकेदार, अन्न महामंडळातील शासनाचा वाहतूक प्रतिनिधी आणि तालुक्याचा शासकीय गोदामपाल यांच्याकडे रवाना होतात. जेव्हां प्रत्यक्ष धान्य पाठविले जाते तेव्हां त्याच्या वाहतुकीसाठी जो परवाना लागतो, त्याच्याही चार प्रती निघतात. त्यांचेही वितरण तसेच असते. याचा सरळ अर्थ असा की, मंजूर धान्यसाठी आणि प्रत्यक्षात तो रवाना झाल्यानंतरची वर्दी तहसीलदारास पूर्णपणे ज्ञात असते. आपल्या तालुक्यासाठी मनमाडच्या वखार महामंडळाकडून निघालेले धान्य आपल्या ताब्यात येते अथवा नाही हे पाहण्याची जबाबदारी त्याचीच असते. जर ताब्यात आले नाही तर लगोलग वरिष्ठांना तसे कळविणे ही जबाबदारीही त्याचीच. पण सातही तालुक्यांबाबत ही जबाबदारी संबंधितांकडून पार पाडली गेली नाही, हे उघड आहे.