शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

इमानाची शीटं बुक झाली तर..!

By admin | Updated: June 14, 2015 01:54 IST

इमानाची शीटं बुक झाली तर..!

संजय पाठक ल्ल नाशिकएष्टी धुवून पुसून अड्ड्यात तयार. ड्रायव्हर-कंडक्टरही तयार... पण पॅसेंजरचा पत्ताच नाही... मग काय तंबाखू मळीत पॅसेंजरची वाट बघायची... बराच वेळ गेला. एक प्रवासी आला. त्याला पाहून दुसरा आला आणि एष्टी आता हलणारच असं लक्षात आल्यावर हळूहळू आख्खी एष्टीच भरली... आता काय द्या डबल... एष्टी सुसाट... हे झालं एष्टीविषयी... पण विमानाचं काय... अरे इथं एक नाही, दोन नाही अगदी शेकडो विकासेच्छुक विमानासाठी व्याकूळ झालेले... विमानतळ बांधून झाले... पण विमानाचा पत्ताच नाही... आता विमान आले तर मग प्रवाशांचा पत्ता नाही... एकेक करीत म्हणे शीट भरली... पेपरात बातमी आली... ५० टक्के शीट भरली आणि आता शंभर टक्के फुल... साऱ्यांची उत्कंठा ताणली गेली प्रवासी किती... फक्त ९!तसा नाशिकचा विकास हा त्याच्या नैसर्गिक उपलब्धता आणि भौगोलिक स्थानामुळे होत असला तरी हा संथगती प्रवास अनेकांना मान्य नाही. जगात कसल्याची प्रोजेक्टची घोषणा होऊ द्या, तो नाशकात अन् नाशकातच झाला पाहिजे, ही त्यांची धारणा. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेपासून पुणे विद्यापीठाच्या विभाजनापर्यंत आणि बोर्इंगच्या प्रकल्पापासून हीरो होंडाच्या प्रकल्पापर्यंत... आयआयएमपासून योग विद्यापीठापर्यंत कसलीही घोषणा झाली की नाशिकच त्यासाठी कसं योग्य आहे, हे सांगण्याची स्पर्धाच सुरू होते. त्यातून फार काही पदरी पडलं आहे, असं दिसत नसल्यानेच बहुधा विकासोच्छुकांची भूक कमी झालेली नाही. बहुत परिश्रम केल्यानंतर संशोधनाअंती दळणवळणासाठी हवाई मार्गावर नाशिकचे नाव नसल्यानेच ही सारी समस्या निर्माण झाल्याचा निष्कर्ष विकासोच्छुकांनी काढला. त्यामुळेच टाटा-बिर्लापासून अंबानीपर्यंत आणि थेट बराक- बिलगेट्सपर्यंत नाशिकमध्ये येण्यास तयार नाही, असं मत झाल्याने नाशिकमध्ये विमानसेवा सुरू व्हावी, असा त्यांचा खासा आग्रह. पण हा निष्कर्ष काढणारे आणि विमानसेवा चालवणाऱ्या कंपन्यांचे गणित जमत नाही. विकास झाला तर (च) हवाईसेवा चालेल असं कंपनीवाल्यांचं म्हणणं, तर विमान आलं तरच विकास असं नाशिकच्या विकासोच्छुक संशोधकांचे मत. या गोंधळात आत्तापर्यंत नाशिकमधून तीनदा बुंग उडालं आणि खालीही उतरलं. परंतु विकासोच्छुक मंडळी ऐकायला तयार नाही. मध्यंतरी नाशिकमध्ये नागरी विमानसेवेसाठी स्वतंत्र ‘विमानतळ’च नाही, अशी एक आवई उठली. लष्कराच्या ताब्यातील परंतु मर्यादित वापरासाठी असलेला विमानतळ पुरेसा नाही, नवीन विमानतळ म्हणजे खरेतर केवळ टर्मिनल बिल्डिंगच हवी असा आग्रह धरण्यात आला. मग ज्यांना अशा मंडळींनी विकासपुरुष बिरुदावली दिली आहे, त्या नाशिकच्या तत्कालीन पालकमंत्र्यांनी हा हट्ट पूर्ण केला. विमानतळ बांधलं, पण विमानाचा पत्ताच नाही. अमुक कंपनी येणार, तमुकने सर्वेक्षण केले, अशा केवळ चर्चाच झाल्या; परंतु कोणीही कंपनी नाशिकचे नाव घ्यायला तयार नाही. मग जलाशयावरून आणि जमिनीवरूनही उड्डाण करू शकणाऱ्या सी प्लेन चालविणाऱ्या मेहेर कंपनीला बहुधा दया आली त्यांनी सध्या लग्न सोहळे आणि पार्ट्यांसाठीच मंगल कार्यालयात रुपांतरीत झालेल्या विमानतळावर एक तरी विमान उडू देण्याचा संकल्प केला. तो जाहीर झाल्यांनतर आता नाशिककरांच्या उड्याच पडणार, असा बहुधा विमानवाल्यांचा मानस असावा. परंतु नऊ सीट भरण्यासाठी आठवडा लागला. पहिल्या दिवशी सर्व्हिस लॉँच होणार. त्यासाठी काही हौशे मिळाले. (अर्थातच नाशिक-पुणे दरम्यान विमानसेवेच्या ५० अखेर इमानाचीशीटंबुक झाली तर..!मिनिटांसाठी सहा हजार रुपये मोजणारे हौशीच असणार ना!) दोन आमदारही गळाला लागलेत म्हणे. सोमवारी सकाळी शुुभारंभाच्या प्रयोगाचा प्रश्न मिटला असला, तरी पुढे काय? एकाच दिवसात आणखी तीन फेऱ्या होणे बाकी आहे. शिवाय विमान एक दिवस नाही, तर सलग चालवायचे आहे. त्यासाठी विकासोच्छुकांचा तितकाच हात हवा आहे, त्यामुळे खडतर मार्गापेक्षा खर्चिक प्रवास बरा, असे म्हणताना ‘मेहर’वर किती ‘मेहरबानी’ होते ते पहायचे. तोपर्यंत पहिल्या फेरीसाठी तरी शुभास्ते पंथाना. (प्रतिनिधी)