शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

चारही स्तंभांनी सामाजिक दायित्व ओळखावे

By admin | Updated: January 13, 2015 23:56 IST

चारही स्तंभांनी सामाजिक दायित्व ओळखावे

श्री श्री रविशंकर : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वाढावा लौकिकनाशिक : धार्मिक, राजकीय, उद्योजक आणि माध्यम या चारही स्तंभांची भूमिका परस्परविरोधी असल्याने जनमानसात या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची प्रतिमा मलीन आहे. या चौघांनी सामाजिक उत्तरदायित्वासाठी (सीएसआर) पुढे आल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा लौकिक वाढेल, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते तथा आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी केले. नाशिक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राजकारण, आध्यात्मिक, उद्योगव माध्यम या क्षेत्रातील अपप्रवृत्तीवर त्यांनी टीका केली. या चारही क्षेत्रांत भ्रष्टाचार फोफावल्याने, जागतिक स्तरावर देश बदनाम झाला आहे. २५ वर्षांपूर्वीचा विचार केल्यास चीन भारताच्या तुलनेत अतिशय मागासलेला देश म्हणून ओळखला जात असे. आज चीनने घेतलेले भरारी जगातिकस्तरावर चिंतेचा विषय बनत आहे. वास्तविक जगाच्या कुठल्याही देशाच्या तुलनेत सार्वधिक ६० टक्के ‘फॅमिली बिझनेस’ भारतात चालतात. देशात प्रतिभावंतांचीदेखील कमी नाही. मात्र अशातही आपली पिछेहाट होत आहे. वैयक्तिक स्वार्थापोटी आपण देशाला मागासलेपण देत आहोत. देशाच्या या स्थितीला केवळ राजकारणी किंवा उद्योगपती जबाबदार नाहीत, तर माध्यम व आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळीदेखील जबाबदार आहे. एका धर्मात अंधश्रद्धा, तर दुसऱ्या धर्मात आतंकवाद असल्याने देश प्रगतीच्या आलेखापासून दूरच आहे. माध्यमेदेखील अशाच प्रकारे परस्परविरोधी भूमिका घेत असल्याने समाजात चांगल्या बाबींना दाखविणे दूरापस्त झाले आहे. जगात कुठल्याही देशात सीएसआर उपक्रम राबविले जात नाहीत. मात्र भारतात अशा प्रकारचे उपक्रम राबवावे लागतात. कारण आपणास सामाजिक दायित्त्वाचा विसर पडला आहे. एकुणच देशाला जगतिक स्तरावर लौकीक मिळवून द्यायचा असेल तर या चारही स्तंभांनी एकत्र येऊन परस्परपूरक भूमिका घेण्याची गरज असल्याचे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अरुण जामकर उपस्थित होते.