शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

चारही स्तंभांनी सामाजिक दायित्व ओळखावे

By admin | Updated: January 13, 2015 23:56 IST

चारही स्तंभांनी सामाजिक दायित्व ओळखावे

श्री श्री रविशंकर : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वाढावा लौकिकनाशिक : धार्मिक, राजकीय, उद्योजक आणि माध्यम या चारही स्तंभांची भूमिका परस्परविरोधी असल्याने जनमानसात या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची प्रतिमा मलीन आहे. या चौघांनी सामाजिक उत्तरदायित्वासाठी (सीएसआर) पुढे आल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा लौकिक वाढेल, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते तथा आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी केले. नाशिक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राजकारण, आध्यात्मिक, उद्योगव माध्यम या क्षेत्रातील अपप्रवृत्तीवर त्यांनी टीका केली. या चारही क्षेत्रांत भ्रष्टाचार फोफावल्याने, जागतिक स्तरावर देश बदनाम झाला आहे. २५ वर्षांपूर्वीचा विचार केल्यास चीन भारताच्या तुलनेत अतिशय मागासलेला देश म्हणून ओळखला जात असे. आज चीनने घेतलेले भरारी जगातिकस्तरावर चिंतेचा विषय बनत आहे. वास्तविक जगाच्या कुठल्याही देशाच्या तुलनेत सार्वधिक ६० टक्के ‘फॅमिली बिझनेस’ भारतात चालतात. देशात प्रतिभावंतांचीदेखील कमी नाही. मात्र अशातही आपली पिछेहाट होत आहे. वैयक्तिक स्वार्थापोटी आपण देशाला मागासलेपण देत आहोत. देशाच्या या स्थितीला केवळ राजकारणी किंवा उद्योगपती जबाबदार नाहीत, तर माध्यम व आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळीदेखील जबाबदार आहे. एका धर्मात अंधश्रद्धा, तर दुसऱ्या धर्मात आतंकवाद असल्याने देश प्रगतीच्या आलेखापासून दूरच आहे. माध्यमेदेखील अशाच प्रकारे परस्परविरोधी भूमिका घेत असल्याने समाजात चांगल्या बाबींना दाखविणे दूरापस्त झाले आहे. जगात कुठल्याही देशात सीएसआर उपक्रम राबविले जात नाहीत. मात्र भारतात अशा प्रकारचे उपक्रम राबवावे लागतात. कारण आपणास सामाजिक दायित्त्वाचा विसर पडला आहे. एकुणच देशाला जगतिक स्तरावर लौकीक मिळवून द्यायचा असेल तर या चारही स्तंभांनी एकत्र येऊन परस्परपूरक भूमिका घेण्याची गरज असल्याचे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अरुण जामकर उपस्थित होते.