नाशिक : इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या वाघ दाम्पत्यांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाल्याने पत्नी रागाच्या भरात माहेरी निघून गेली. त्यामुळे रागाच्या भरात मद्य प्राशन करून पतीने आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इंदिरानगरमधील पांडवनगरी परिसरातील भीष्म सोसायटीत राहणारे नितीन हरिभाऊ वाघ (२४) यांनी गळफास लावून आत्महत्त्या केली. काही दिवसांपुर्वी वाघ यांचे त्यांच्या पत्नीसोबत किरकोळ भांडण झाले होते. या भांडणावरून पत्नीने वडिलांसह माहेर गाठले. यामुळे नितीन यांना राग आल्याने त्यांनी मद्याच्या नशेत घरातील पंख्याला दोरी लावून गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची फिर्याद मयत वाघ यांचे भाऊ विकी वाघ यांनी इंदिरानगर पोलिसांत दिली आहे. फिर्यादीत याबाबत घडलेला प्रकार कथन करण्यात आला आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पत्नी माहेरी गेल्याने पतीची आत्महत्त्या
By admin | Updated: March 28, 2017 17:05 IST