शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

By admin | Updated: October 1, 2016 00:07 IST

कळवण : वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने राज्यपालांचे लक्ष वेधले

कळवण : यंदाच्या शैक्षणिक वर्षात निरनिराळ्या शैक्षणिक शाखांना प्रवेश घेतलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांपैकी ९८७ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत, तर वसतिगृहाची सोय झाली नाही म्हणून शेकडो विद्यार्थी कळवण शहरातून व तालुक्यातून माघारी घराकडे परतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रता असूनही शेकडो आदिवासी विद्यार्थी केवळ राहण्याची व्यवस्था नसल्याने शिक्षणापासून वंचित झाले आहेत. वसतिगृहाची सोय करावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींसह जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, विधिमंडळ अनुसूचित जाती- जमाती समितीचे अध्यक्ष आमदार रुपेश म्हात्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.कळवण, मानूर, अभोणा, कनाशी, दळवट, नाकोडे तसेच सुरगाणा, बोरगाव, देवळा, डांगसौंदाणे आदि कळवण प्रकल्पांतर्गत येत असलेल्या निरनिराळ्या शासकीय अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालयांमध्ये तसेच इतर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात निरनिराळ्या शैक्षणिक शाखांना प्रवेश घेतलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांपैकी ९८७ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. वसतिगृहासाठी ३२८० विद्यार्थिसंख्या मंजूर असून, ३३१५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. ९८७ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज प्रलंबित असून, १२५० वाढीव प्रवेशाची मागणी शासनस्तरावर करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्प कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. ९८७ विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश अर्ज शासनस्तरावर खास बाब म्हणून मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत, तर वसतिगृहाची सोय झाली नाही म्हणून अनेक विद्यार्थी घराकडे परतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पात्रता असूनही हे विद्यार्थी केवळ राहण्याची व्यवस्था नसल्याने शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. या प्रवेशासंबंधी गेल्या ३ ते ४ वर्षांपासून कळवण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आंदोलन, मोर्चा तसेच टाळेबंदी आंदोलने झाली. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. राज्यपालांना यासंदर्भात निवेदन देण्यात येऊन लक्ष वेधून घेतल्यानंतर शासनस्तरावरून व मंत्रालयातून खास बाब म्हणून आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्यासाठी जयश्री पवार यांना मागील काळात यश आले होते. (वार्ताहर)कळवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याची मागणीआदिवासी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळावा म्हणून कळवण प्रकल्पांतर्गत असलेल्या सात तालुक्यांतील आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक नाशिक, कळवण येथील अधिकाऱ्यांच्या दारात जाऊन प्रवेशाची याचना करीत आहेत. कळवण तालुक्यातील शासकीय वसतिगृहांचा उपयोग तालुक्यातील विद्यार्थ्यांना होणार नसेल तर त्यांचा काय उपयोग? माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय सुरू होऊन चार महिने झाले असून, काही पाठ्यक्र माच्या विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची परीक्षेची तारीखदेखील जाहीर झाली आहे. कळवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देताना प्राधान्य दिले जावे, अशी मागणी विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक करीत असताना प्रकल्प कार्यालयातील जबाबदार अधिकारी ‘आम्ही तुम्हाला कुठलीही मदत करू शकत नाही, तुम्हाला पटेल ते करा’ अशी बेजबाबदार वक्तव्ये करीत मंत्रालयातून आदेश येईल तेव्हा प्रवेश मिळेल, अशी उत्तरे आदिवासी पालकांना दिली जात आहेत.मागील चार महिन्यांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेशासंबंधीचा घोळ सुरूच असून, कळवण तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना दररोज पदरखर्च करून शिक्षण घ्यावे लागत असून, शासनाच्या आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना असलेल्या सवलतीचा फायदा होत नसल्याने आदिवासी बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे. - डी. एम. गायकवाड, अध्यक्ष, आदिवासी संघर्ष समिती, कळवण