शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

By admin | Updated: October 1, 2016 00:07 IST

कळवण : वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने राज्यपालांचे लक्ष वेधले

कळवण : यंदाच्या शैक्षणिक वर्षात निरनिराळ्या शैक्षणिक शाखांना प्रवेश घेतलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांपैकी ९८७ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत, तर वसतिगृहाची सोय झाली नाही म्हणून शेकडो विद्यार्थी कळवण शहरातून व तालुक्यातून माघारी घराकडे परतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रता असूनही शेकडो आदिवासी विद्यार्थी केवळ राहण्याची व्यवस्था नसल्याने शिक्षणापासून वंचित झाले आहेत. वसतिगृहाची सोय करावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींसह जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, विधिमंडळ अनुसूचित जाती- जमाती समितीचे अध्यक्ष आमदार रुपेश म्हात्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.कळवण, मानूर, अभोणा, कनाशी, दळवट, नाकोडे तसेच सुरगाणा, बोरगाव, देवळा, डांगसौंदाणे आदि कळवण प्रकल्पांतर्गत येत असलेल्या निरनिराळ्या शासकीय अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालयांमध्ये तसेच इतर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात निरनिराळ्या शैक्षणिक शाखांना प्रवेश घेतलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांपैकी ९८७ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. वसतिगृहासाठी ३२८० विद्यार्थिसंख्या मंजूर असून, ३३१५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. ९८७ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज प्रलंबित असून, १२५० वाढीव प्रवेशाची मागणी शासनस्तरावर करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्प कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. ९८७ विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश अर्ज शासनस्तरावर खास बाब म्हणून मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत, तर वसतिगृहाची सोय झाली नाही म्हणून अनेक विद्यार्थी घराकडे परतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पात्रता असूनही हे विद्यार्थी केवळ राहण्याची व्यवस्था नसल्याने शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. या प्रवेशासंबंधी गेल्या ३ ते ४ वर्षांपासून कळवण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आंदोलन, मोर्चा तसेच टाळेबंदी आंदोलने झाली. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. राज्यपालांना यासंदर्भात निवेदन देण्यात येऊन लक्ष वेधून घेतल्यानंतर शासनस्तरावरून व मंत्रालयातून खास बाब म्हणून आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्यासाठी जयश्री पवार यांना मागील काळात यश आले होते. (वार्ताहर)कळवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याची मागणीआदिवासी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळावा म्हणून कळवण प्रकल्पांतर्गत असलेल्या सात तालुक्यांतील आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक नाशिक, कळवण येथील अधिकाऱ्यांच्या दारात जाऊन प्रवेशाची याचना करीत आहेत. कळवण तालुक्यातील शासकीय वसतिगृहांचा उपयोग तालुक्यातील विद्यार्थ्यांना होणार नसेल तर त्यांचा काय उपयोग? माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय सुरू होऊन चार महिने झाले असून, काही पाठ्यक्र माच्या विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची परीक्षेची तारीखदेखील जाहीर झाली आहे. कळवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देताना प्राधान्य दिले जावे, अशी मागणी विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक करीत असताना प्रकल्प कार्यालयातील जबाबदार अधिकारी ‘आम्ही तुम्हाला कुठलीही मदत करू शकत नाही, तुम्हाला पटेल ते करा’ अशी बेजबाबदार वक्तव्ये करीत मंत्रालयातून आदेश येईल तेव्हा प्रवेश मिळेल, अशी उत्तरे आदिवासी पालकांना दिली जात आहेत.मागील चार महिन्यांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेशासंबंधीचा घोळ सुरूच असून, कळवण तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना दररोज पदरखर्च करून शिक्षण घ्यावे लागत असून, शासनाच्या आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना असलेल्या सवलतीचा फायदा होत नसल्याने आदिवासी बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे. - डी. एम. गायकवाड, अध्यक्ष, आदिवासी संघर्ष समिती, कळवण