शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

नायगाव खोऱ्यात शेकडो एकर कोबी, टमाट्यावर फिरविला रोटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:19 IST

नायगाव : सध्या बाजारात सर्वच भाजीपाला कवडीमोल भावाने विक्री होत आहे. अशा परिस्थितीत उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या हातात येत नसल्याने ...

नायगाव : सध्या बाजारात सर्वच भाजीपाला कवडीमोल भावाने विक्री होत आहे. अशा परिस्थितीत उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या हातात येत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. महागडा खर्च करून पिकवलेला माल बाजारात फेकण्याऐवजी शेतातच सडवण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी सुरू केला आहे. सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात शेकडो एकर कोबी व टमाट्याच्या पिकावर बळीराजाने रोटर फिरवला आहे.

सध्या बाजारात कोबीला कवडीमोल दर मिळत असल्यामुळे या पिकाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना कोणी कोबी घेत का? कोबी? अशी भावनिक साद घालण्याची वेळ कृषी प्रधान देशातील बळीराजावर आली आहे. सध्या सर्वच भाजीपाल्याला मातीमोल दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चावर शासन नियमाप्रमाणे दीडपट हमीभाव तर सोडाच विक्री केलेल्या मालातून उत्पादन खर्चाच्या तीनपट कमी पैसे हातात पडत असल्यामुळे शेतीसह शेतकरी कुटुंबावर सध्या नैराश्याची छाया पसरली आहे.

सिन्नर तालुक्यातील शेतकरी खरिपाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात कोबी, फ्लाॅवर, टमाटे, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, मेथी आदींसह वेलवर्गीय पिके घेत असतात. यंदा पावसाचे प्रमाणही अत्यल्प राहिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या जिगरीवर हे पिके घेतली. या पिकांना पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी न मिळाल्याने या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. अशा प्रतिकूल परिस्थितीत महागडी औषधे, खते व कीटकनाशकांच्या फवारणी करून हे पिके जगवली आहे. अशा या पिकांना गेल्या महिनाभरापासून बाजारात मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्चाएवढेही पैसे येत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

------------------------

कोणी कोबी घेता...का कोबी?

कोबी पिकाचे तर मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. हे पीक गेल्या काही दिवसांपासून विविध रोगांना बळी पडत आहे. अशा परिस्थितीतून हे पीक घेणे अवघड झाले आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या बियाण्यांच्या, खते, औषधे व कीटकनाशकांचे भाव लक्षात घेता सध्या एक एकर कोबी पिकावर शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्च येतो. मात्र, याच पिकाला सध्या बाजारात जास्तीत जास्त एक रुपया किलो भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांना तर अक्षरशः व्यापाऱ्यांच्या मागे फिरवून कोणी कोबी घेता...का कोबी? अशी आरोळी मारत फिरण्याची वेळ आली आहे.

-----------------------------

उत्पादन खर्चाचा बोजा निघेना

सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यातील जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राम्हणवाडे, सोनगिरी, जोगलटेंभी व मोह आदी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून शेकडो एकर क्षेत्रातील कोबी, टमाटे व कोथिंबीर या पिकांवर नांगर फिरवला आहे. या पिकांवर झालेला उत्पादन खर्चही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या माथी लाखो रुपयांचा बोजा मात्र चढला आहे.

------------------

मी दोन एकर क्षेत्रात कोबीचे पीक घेतले होते. या पिकाला काढणीपर्यंत खते, औषधे, कीटकनाशके, मजुरी व बियाणे असा सर्व दीड लाख रुपये खर्च आला होता. मात्र, विक्रीच्या वेळेत भाजारभाव अत्यल्प झाल्याने या कोबी पिकास घेण्यासही कोणीच धजावले नाही. अशा परिस्थितीत मार्केटला जाण्याचा खर्चही फिटत नसल्याने मी या सर्व क्षेत्रावर रोटाव्हेटर फिरवले. उत्पादन खर्चही हाती न पडल्याने पुढील पिकाची तयारी कशी करावी हाच प्रश्न सतावत आहे. - रमेश आव्हाड, शेतकरी, जायगाव

----------------

फोटो ओळी - सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे कोबी पिकावर रोटाव्हेटर फिरवताना शेतकरी . (०९ नायगाव)

090921\09nsk_14_09092021_13.jpg

०९नायगाव