शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

गृहनिर्माण सोसायट्या सरकार चालविणार?

By admin | Updated: February 9, 2016 23:19 IST

नवे प्रशासकीय सत्ता केंद्र : मुदतवाढ राहिली कागदावरच; लाखो रुपये खर्चून अवसायकांना देणार प्रशिक्षण

 नाशिक : राज्यातील सहकारी संस्थांचा सर्व्हे करण्याच्या नावाखाली राजकारण्यांच्या सहकारी संस्था सोडून राज्य शासनाने सामान्य नागरिकांच्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांनाच लक्ष केले आहे. लेखापरीक्षण सादर केले नसल्याच्या नावाखाली बरखास्त करण्यात आलेल्या सोसायट्या आता अवसायकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. एकीकडे सहकारमंत्र्यांनी या सोसायट्यांना मुदतवाढ देण्याची घोषणा केली असताना दुसरीकडे मात्र अवसायकांच्या माध्यमातूनच यापुढे कामकाज करण्याची तयारी असून, त्यादृष्टीने प्रशिक्षण देण्यासाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.राज्यात युती सरकार सत्तेवर आल्यानंतर सहकारी संस्थांमधील गैरप्रकार शोधण्यासाठी आणि नावाला असलेल्या संस्था बंद करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अर्थातच सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसची सत्ता असल्याने सरकारने लक्ष्य केले असल्याची टीका करण्यात येत असली तरी प्रत्यक्षात सरकारने अशा संस्था सोडून सामान्य नागरिकांच्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्या लक्ष्य करण्यात आल्या आहेत. राज्यात ९० हजार सहकारी सोसायट्या आहेत. त्यातील बहुतांशी सोसायट्या दहा ते पंधरा वर्षांपासून लेखापरीक्षण न केल्याच्या कारणाखाली बरखास्त करण्यात आल्या आहेत. वास्तविक, त्यासाठी झालेले सर्र्वेक्षण चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे करण्यात आल्याचा आरोप आहे. तरीही सरकारने ही कार्यवाही करताना या सोसायट्या बरखास्त करून अवसायक नियुक्त केले आहेत. सहकारी संस्थांच्या अनेक अडचणी असून, अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये वादविवाद, सभासदांनी देखभाल आणि अन्य शुल्क न भरणे अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे या सोसायट्यांना मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांनी मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ दिल्याची घोषणा केली, परंतु ती कागदावर न उतरल्याने सध्या सोसायट्या अवसायकांच्या ताब्यात आहेत. अवसायक हे तात्पुरत्या स्वरूपात असतील असा सोसायट्यांचा भ्रम ठरला असून, आता अवसायकांच्या माध्यमातून सोसायट्या चालविण्याचा चंग शासनाने बांधला आहे. पुण्यातील यशदा संस्थेमार्फत या अवसायकांना गृहनिर्माण संस्था कशा चालवाव्या या विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार असून, सध्या १७ लाख रुपये मंजूर असले तरी आणखी सात लाख अतिरिक्त म्हणजे सुमारे २४ लाख रुपये देण्याची तयारी शासनाने केली आहे. (प्रतिनिधी)