शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी येवला तहसील कार्यालयात तासभर ठिय्या

By admin | Updated: June 8, 2016 22:33 IST

दखल : दोन दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

 

येवला : कानडी गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाटोदा शिवारात असलेली कानडी ग्रामपंचायतीची विहीर खोलीकरण करण्यासाठी होणाऱ्या पाटोदा गावच्या काही ग्रामस्थांनी केलेल्या विरोधात प्रशासनाने हस्तक्षेप करून विहीर खोलीकरणाचा मार्ग मोकळा करावा, असा आग्रह कानडी गावच्या महिलांनी धरला आणि तहसील आवारात ५५ महिलांनी आपल्या हंड्यांसह सुमारे तासभर ठिय्या मांडला. हंडा नाद केल्याने संपूर्ण तहसील आवाराचे लक्ष या महिलांनी वेधून घेतले होते. आम्हाला टॅँकरचे पाणी पुरत नाही. आमच्या हक्काच्या विहिरीचे खोलीकरण करू द्या, अशी मागणी करीत थेट तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि निवेदनही दिले. आम्ही २४ किलोमीटरवरून आलो, आमचा प्रश्न सोडवा, अशी आग्रही भूमिका महिलांनी घेतली. दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार शरद मंडलिक व गटविकास अधिकारी सुनील आहिरे हे दोन दिवसात कानडी गावचा पाणीपुरवठा करणाऱ्या या विहिरीची प्रत्यक्ष पाहणी करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महिलांना मिळाल्याने प्रश्न मार्गी लागणार या आशेने त्या महिला परतल्या.येवला पंचायत समितीच्या वतीने कानडी गावाला टँँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी पाण्याची तहान भागात नाही, असे कानडी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शोभा उशीर, रेखा हारपडे, पुष्पा दौंड, अलका हिरे, चांगुणा काळे, पुष्पा होल्गर, राधिका डमाळे, चंद्रकला खुरचणे, चंद्रकला झेंडे, सुनीता झेंडे, पर्वताबाई बोडके, आशा खुरचणे, निर्मला काळे, चंद्रकांत जाधव, दत्तात्रय अहेर, परसराम गुंजाळ, मोहन काळे, योगेश हारपडे, संजय काळे, रवींद्र उशीर, सुभाष काळे यांच्यासह महिलांनी चर्चेत भाग घेत आपली व्यथा मांडली. (वार्ताहर)