शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

राष्ट्रध्वजाचा सन्मान यातच आपली शान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:27 IST

नाशिक : स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला स्विकृती मिळून २२ जुलैला ७० वर्ष पूर्ण होत असून येत्या १५ आॅगस्टला देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमिवर हा राष्ट्रीय ध्वज मानाने फडकवला जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला स्विकृती मिळून २२ जुलैला ७० वर्ष पूर्ण होत असून येत्या १५ आॅगस्टला देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमिवर हा राष्ट्रीय ध्वज मानाने आणि स्वाभीमाने फडकवला जाणार आहे. डौलाने फडकणाऱ्या आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान यातच आपली शान असल्यामुळे सर्वांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा, असे आवाहन आवाहन विविध सोशल माध्यमांसह वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांकडून केले जात आहे.  राष्ट्रध्वजाचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. तसेच त्याचा यथोचित सन्मान होणेही आवश्यक आहे. म्हणून प्लॅस्टिकपासून तयार झालेले ध्वज वापरु नये. त्यांचा कागदी ध्वजाप्रमाणे पुननिर्मितीसाठी वापर होत नाही, त्यामुळे राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा प्रश्न उद््भवतो. भारतीय राष्ट्रध्वजाच्या संदर्भात भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची जी राष्ट्रध्वज नियमावली आहे तिचे पालन करावे. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या (फ्लॅग कोड आॅफ इंडिया) कलम १.२ ते १, ५ मध्ये राष्ट्रध्वजाच्या वापराबाबतच्या तरतूदीनुसार राष्ट्रध्वज वापरावा.  प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वज वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. त्याचा विचार करता कोणीही प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वज वापरु नये. राष्ट्रध्वजाचा अपमान तथा अवमान हा दंडनीय गुन्हा असून राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक कायदा, १९७१ नुसार शिक्षेस पात्र आहे.राष्ट्रध्वजाचा सन्मानभारतीय राष्ट्रध्वज हा आपला राष्ट्रीय अभिमान व सार्वभौमत्वाचा संकेत आहे. राष्ट्रध्वज देशातील नागरिकांच्या इच्छा, आकांक्षा व अपेक्षांचे प्रतिक आहे. राष्ट्रध्वजाबाबत असलेल्या २००२ च्या नियमानुसार सामान्य नागरिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था आदिंनी संथांनी राष्ट्रध्वज फडकविण्यास कुठलेही बंधन नाही. केवळ राष्ट्रध्वज फडकविताना पुढील मार्गदर्शक तत्वानुसार राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे आवश्यक आहे.राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत तसेच राष्ट्रध्वज नियमावलीबाबत अधिक माहिती ँ३३स्र://ेँं.ल्ल्रू.्रल्ल/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.योग्य कार्यवाही व्हावी१५ आॅगस्ट व २६ जानेवारी रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्र म तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्र मादरम्यान विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. त्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्र माच्या ठिकाणी इतरस्त: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी.