शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

न्यायालयाचा आदर करा अन् धार्मिक भावनांचाही

By admin | Updated: January 11, 2015 00:28 IST

धर्मगुरुंच्या प्रतिक्रिया : काळजीपूर्वक विषय हाताळण्याचे आवाहन

नाशिक : उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर महापालिकेला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे तोडावी लागणार असली तरी यासंदर्भात नाशिकमधील विविध धार्मिक नेत्यांनी सबुरीची भूमिका घेतली आहे. न्यायालयाच्या आदेशाबरोबरच धार्मिक भावनांचादेखील विचार करावा, असे आवाहन त्यांनी पालिका यंत्रणेला केले आहे.उच्च न्यायालयात धार्मिक स्थळाच्या अतिक्रमणांबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने चार आठवड्यांत रस्ते आणि पदपथांवर असलेले धार्मिक स्थळांची अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकसह काही महापालिकांना यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेतच, परंतु शासकीय किंवा निमशासकीय जागेचा वापर केल्याबद्दल संबंधितांकडून भाडे वसूल करण्याचेही आदेश दिले आहेत.यासंदर्भात नाशिकमध्ये धर्मगुरुंशी संपर्क साधला असता त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र धार्मिक स्थळांबाबत सर्व धर्मियांना विश्वासात घेऊनच कारवाई करावी, अशी मागणी केली. यासंदर्भात सेेंट थॉमस चर्चचे रेव्हरन्ट अनंत आपटे यांनी सर्व समाजाने जागृकता निर्माण करणे गरजेचे आहे. यामुळे समाजात सुधारणा होऊन अवैध धार्मिक स्थळे निर्माण होणार नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णय हा स्त्युत्य आहे; मात्र स्थानिक प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करताना धार्मिक भावनांचे हित लक्षात घेण्याचा प्रयत्न अवश्य करावा. जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही व कायदा सुव्यवस्था आणि शांतता टिकून राहण्यास मदत होईल, असे सांगितले.कोकणीपुरा मशिदीचे मुख्य इमाम मौलाना मुफ्ती रिजवान सय्यद, जर कोणत्याही रस्त्यात मदरसा अडथळा ठरत असेल तर मदरसा योग्य त्या सुरक्षित ठिकाणी हलविता येऊ शकतो; मात्र मशिद किंवा सुफी संतांचा दर्गा आहे त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हटविणे, इस्लामी धार्मिक नियमांमध्ये बसत नाही. स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी ज्या ठिकाणी धार्मिक प्रार्थनास्थळांची निर्मिती केली गेली असेल, तर हे अत्यंत चुकीची बाब आहे. त्याबाबत स्थानिक प्रशासनाने सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. रस्ते हे जनतेसाठी असून त्याची सुरक्षितता ही जनतेचीच जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वच शहरातील जनतेने खबरदारी घेणे हे कर्तव्यच आहे. उच्च न्यायलयाच्या आदेशाचे शहरातील स्वागत करतो. मात्र धार्मिक भावना लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)