शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

रमाई आवास योजनेत ३६ हजार कुटुंबीयांना घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

नाशिक : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील कुटुंबांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेत नाशिक विभागातील ३६ हजार ...

नाशिक : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील कुटुंबांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेत नाशिक विभागातील ३६ हजार कुटुंबीयांना हक्काचे घर लाभले आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १३ हजार घरकुलांचे काम पूर्णत्वास आले आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांचे राहणीमान उंचावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागात रमाई आवास योजना राबविली जाते. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव व अहमदनगर या पाच जिल्ह्यांतील अनुसूचित जातीच्या ३६२०८ कुटुंबाच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न साकार झाले असून २५०२८ घरकुलांची बांधकामे पूर्णत्वाच्या दिशेने सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाने दिली.

या योजनेत नाशिक जिल्ह्यात (शहर, ग्रामीण व नगरपालिका) ५००८ घरकुले पूर्ण झाली आहेत. तर ९३७४ घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत. धुळे जिल्ह्यात ४३१७ घरकुले पूर्ण झाली आहेत. ३३०१ घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहे. नंदुरबार जिल्ह्यात ३१९३ घरकुले पूर्ण झाली आहेत. तर ७७० घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. जळगांव जिल्ह्यात १३२६४ घरकुले पूर्ण झाली आहेत. ६७१८ घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. अहमदनगर जिल्ह्यात १०४२६ घरकुले पूर्ण झाली आहेत. ४८६५ घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत.

राज्य सरकारने अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील कुटुंबांसाठी २००९ यावर्षी रमाई आवास योजना सुरू केली आहे. ग्रामीण व शहरी भागांत स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या जागेवर २६९ चौरस फुटांचे पक्के घर बांधण्यात येते. सदर योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, शहरी भागासाठी नगर परिषद, नगरपालिका व महानगरपालिका या स्थानिक यंत्रणेमार्फत करण्यात येते. ज्या लाभार्थ्यांचे नाव सामाजिक-आर्थिक जात सर्वेक्षण-२०११ यादीमध्ये नाही. परंतु, ज्या लाभार्थ्यांना घराची आवश्यकता आहे. अशा लाभार्थ्यांची नावे ‘प्रपत्र-ड’मध्ये असतील तर त्या लाभार्थींची निवड केली जाते.

या योजनेत कच्चे घर असणाऱ्या कुटुंबांना नवीन पक्के घर बांधकामासाठी आर्थिक साहाय्य देण्यात येते. घर बांधकामासाठी ग्रामीण भागासाठी १ लाख ३२ हजार रुपये व नक्षलग्रस्त डोंगराळ क्षेत्रासाठी १ लाख ४२ हजार रुपये व नगरपालिका, नगरपरिषद व महानगरपालिका व मुंबई विकास प्राधिकरण क्षेत्रासाठी २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधण्यास स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

अर्जदाराच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण क्षेत्रासाठी १ लाख रुपये, नगरपरिषद, नगरपालिका क्षेत्रासाठी १ लाख ५० रुपये, महानगरपालिका क्षेत्र व मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रासाठी २ लाख रुपये इतकी आहे. सदर योजनेचा लाभ कुटुंबांतील एकाच व्यक्तीस देण्यात येतो.

--इन्फो--

जागेसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय योजना

२०१५ पासून पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेतील ग्रामीण क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील घरकुलासाठी पात्र असणाऱ्या, परंतु जागा उपलब्ध नसणाऱ्या लाभार्थ्यांसाठी जागा खरेदीकरिता ५० हजार रुपयांपर्यत अर्थसाहाय्य देण्यात येते. योजनेच्या लाभासाठी, ग्रामीण भागासाठी तालुकास्तरावर पंचायत समिती किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच शहरासाठी समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे.