शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

वाहनांच्या घसरण्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST

नाशिक शहरातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर सर्वांत लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात आला असला तरी, शहरांतर्गत वाहतुकीसाठी वाहनचालकांना पुलाखालील राष्ट्रीय महामार्ग ...

नाशिक शहरातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर सर्वांत लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात आला असला तरी, शहरांतर्गत वाहतुकीसाठी वाहनचालकांना पुलाखालील राष्ट्रीय महामार्ग व समांतर रस्त्याशिवाय पर्याय नाही, परिणामी या रस्त्यावरील वर्दळ कायम आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडला की, रस्ता वाहन चालविण्यासाठी धोकेेदायक ठरू लागला असून, गेल्या आठवड्यात पंचवटीतील आडगाव नाका, दंत महाविद्यालय या भागात चिखल व पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहने घसरण्याची घटना घडल्याने अपघात टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने अग्निशामक बंबाच्या साहाय्याने सदरचा रस्ता धुवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अल्पकाळ ठरला. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने उड्डाणपुलाखाली ज्याठिकाणी पावसाच्या पाण्याने रस्ता धुतला जातो त्याठिकाणी हा प्रकार घडत नाही, मात्र ज्या ठिकाणी पाणी पडत नाही, अशा ठिकाणी वाहन घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. पुलाखाली व आजूबाजूला असलेल्या शोभिवंत झाडांची माती पावसामुळे रस्त्यावर वाहून येत असल्यामुळेदेखील हा प्रकार सुरू असल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. त्यामुळे पंचवटीतील स्वामी नारायण चौकीसमोर उड्डाण पुलाखालील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करून समांतर जोड रस्त्याने वाहतूक वळविली. त्याच प्रमाणे द्वारका चौकाच्या पुढे वडाळानाका चौफुलीवरून रस्ता बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आला आहे. मुंबई नाक्याकडून इंदिरानगरकडे जातांनादेखील हाच प्रकार घडत असल्याने तेथेही बुधवारी रात्रीपासून रस्ता बंद करून समांतर रस्त्याने दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

महामार्ग वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे समांतर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. त्यातल्या त्यात मुंबई नाका, द्वारका चौक व आडगाव नाका येथे वाहनांच्या रांगा लागत असून, या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

चौकट=

कायमस्वरूपी उपाययोजना करू

महामार्गावर वाहन घसरण्याचे प्रकार पाहता, ज्या ठिकाणी हे प्रकार घडत आहेत, तेथील रस्ता पाण्याने स्वच्छ धुण्यात येत आहे तसेच जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर चरे मारण्यात आले असून, काही रासायनिक प्रक्रिया करून हा प्रकार टाळण्याचाही प्रयत्न केला गेला; परंतु नवीन ठिकाणी हा प्रकार घडत असल्याने तूर्त पाऊस सुरू असल्यामुळे रस्ता बॅरिकेडिंगने बंद केला आहे. तथापि, कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तंत्रज्ञांकडून सल्ला व शोध घेतला जाईल.

- दिलीप पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण