शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वाहनांच्या घसरण्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST

नाशिक शहरातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर सर्वांत लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात आला असला तरी, शहरांतर्गत वाहतुकीसाठी वाहनचालकांना पुलाखालील राष्ट्रीय महामार्ग ...

नाशिक शहरातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर सर्वांत लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात आला असला तरी, शहरांतर्गत वाहतुकीसाठी वाहनचालकांना पुलाखालील राष्ट्रीय महामार्ग व समांतर रस्त्याशिवाय पर्याय नाही, परिणामी या रस्त्यावरील वर्दळ कायम आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडला की, रस्ता वाहन चालविण्यासाठी धोकेेदायक ठरू लागला असून, गेल्या आठवड्यात पंचवटीतील आडगाव नाका, दंत महाविद्यालय या भागात चिखल व पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहने घसरण्याची घटना घडल्याने अपघात टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने अग्निशामक बंबाच्या साहाय्याने सदरचा रस्ता धुवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अल्पकाळ ठरला. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने उड्डाणपुलाखाली ज्याठिकाणी पावसाच्या पाण्याने रस्ता धुतला जातो त्याठिकाणी हा प्रकार घडत नाही, मात्र ज्या ठिकाणी पाणी पडत नाही, अशा ठिकाणी वाहन घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. पुलाखाली व आजूबाजूला असलेल्या शोभिवंत झाडांची माती पावसामुळे रस्त्यावर वाहून येत असल्यामुळेदेखील हा प्रकार सुरू असल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. त्यामुळे पंचवटीतील स्वामी नारायण चौकीसमोर उड्डाण पुलाखालील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करून समांतर जोड रस्त्याने वाहतूक वळविली. त्याच प्रमाणे द्वारका चौकाच्या पुढे वडाळानाका चौफुलीवरून रस्ता बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आला आहे. मुंबई नाक्याकडून इंदिरानगरकडे जातांनादेखील हाच प्रकार घडत असल्याने तेथेही बुधवारी रात्रीपासून रस्ता बंद करून समांतर रस्त्याने दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

महामार्ग वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे समांतर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. त्यातल्या त्यात मुंबई नाका, द्वारका चौक व आडगाव नाका येथे वाहनांच्या रांगा लागत असून, या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

चौकट=

कायमस्वरूपी उपाययोजना करू

महामार्गावर वाहन घसरण्याचे प्रकार पाहता, ज्या ठिकाणी हे प्रकार घडत आहेत, तेथील रस्ता पाण्याने स्वच्छ धुण्यात येत आहे तसेच जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर चरे मारण्यात आले असून, काही रासायनिक प्रक्रिया करून हा प्रकार टाळण्याचाही प्रयत्न केला गेला; परंतु नवीन ठिकाणी हा प्रकार घडत असल्याने तूर्त पाऊस सुरू असल्यामुळे रस्ता बॅरिकेडिंगने बंद केला आहे. तथापि, कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तंत्रज्ञांकडून सल्ला व शोध घेतला जाईल.

- दिलीप पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण