शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

छुपी पाणीकपात, कारभारी अंधारात!

By admin | Updated: February 10, 2016 00:17 IST

प्रशासनाचा प्रताप : पदाधिकाऱ्यांकडून भांडाफोड, कपात रद्दचे महापौरांचे आदेश

 नाशिक : शहराला वाढीव पाणीकपातीची गरज नाही आणि ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा गंगापूर धरणसमूहात उपलब्ध असल्याचा वारंवार दावा एकीकडे पालकमंत्री करत असताना महापालिका प्रशासनाने मात्र नियमित १५ टक्के पाणीकपातीव्यतिरिक्त सुमारे १० टक्के वाढीव पाणीकपात कारभाऱ्यांना अंधारात ठेवत छुप्या पद्धतीने लागू केली असल्याचे उघडकीस आले आहे. महापौर, उपमहापौरांसह गटनेत्यांनीच आकडेवारीनिशी छुप्या पाणीकपातीचा भांडाफोड करत प्रशासनाला चिमटीत पकडले. पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी प्रायोगिक तत्त्वावर सदर पाणीकपात सुरू केल्याची कबुली दिल्यानंतर महापौरांनी सदर वाढीव पाणीकपात तत्काळ रद्द करण्याचे आणि पालकमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणेच नियमित १५ टक्के पाणीकपात सुरू ठेवण्याचे आदेशित केले. दरम्यान, प्रशासनाचा बोलविता धनी वेगळाच असल्याने पाणीकपातीवरून पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणीकपातीवरून महापालिकेतील सत्ताधारी आघाडी आणि भाजपा यांच्यात संघर्ष टोकाला जाऊन पोहोचला आहे. गेल्या गुरुवारी त्र्यंबकेश्वरी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या महापूजेसाठी आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गंगापूर धरणातील आणखी ३०० दलघफू पाणी महापालिकेसाठी आरक्षित करण्याचे जाहीर केले होते. याशिवाय, वाढीव पाणीकपातीची गरज नसल्याचेही स्पष्ट केले होते. आमदार बाळासाहेब सानप यांनीही वाढीव पाणीकपात होणार नसल्याचे ठामपणे सांगितले होते. वाढीव पाणी आरक्षण मिळाल्याने आता पाणीकपात होणार नाही, असे मानले जात असतानाच गेल्या ५ फेबु्रवारीपासून शहरात नागरिकांकडून पाण्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. वाढत्या तक्रारींचे प्रमाण लक्षात घेऊन उपमहापौर गुरुमित बग्गा आणि शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी त्याबाबत शोधकार्य सुरू केले असता महापालिका प्रशासनाने गेल्या चार दिवसांपासून छुपी पाणीकपात सुरूकेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मंगळवारी दुपारी उपमहापौरांसह सर्व गटनेत्यांनी महापौरांची भेट घेऊन छुप्या पाणीकपातीचे धक्कादायक वास्तव अगदी आकडेवारीनिशीच मांडले. उपलब्ध आकडेवारीनुसार, १५ टक्के पाणीकपात सुरू असताना गंगापूर आणि दारणा धरणातून प्रतिदिन १२.६० दलघफू पाणी उचलले जात होते. दि. १ ते ३१ जानेवारी २०१६ या कालावधीत गंगापूर धरणातून ३५७.६८ दलघफू, तर दारणातून ३२.९७ दलघफू पाणी उचलले गेले.