शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

छुपी पाणीकपात, कारभारी अंधारात!

By admin | Updated: February 10, 2016 00:17 IST

प्रशासनाचा प्रताप : पदाधिकाऱ्यांकडून भांडाफोड, कपात रद्दचे महापौरांचे आदेश

 नाशिक : शहराला वाढीव पाणीकपातीची गरज नाही आणि ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा गंगापूर धरणसमूहात उपलब्ध असल्याचा वारंवार दावा एकीकडे पालकमंत्री करत असताना महापालिका प्रशासनाने मात्र नियमित १५ टक्के पाणीकपातीव्यतिरिक्त सुमारे १० टक्के वाढीव पाणीकपात कारभाऱ्यांना अंधारात ठेवत छुप्या पद्धतीने लागू केली असल्याचे उघडकीस आले आहे. महापौर, उपमहापौरांसह गटनेत्यांनीच आकडेवारीनिशी छुप्या पाणीकपातीचा भांडाफोड करत प्रशासनाला चिमटीत पकडले. पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी प्रायोगिक तत्त्वावर सदर पाणीकपात सुरू केल्याची कबुली दिल्यानंतर महापौरांनी सदर वाढीव पाणीकपात तत्काळ रद्द करण्याचे आणि पालकमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणेच नियमित १५ टक्के पाणीकपात सुरू ठेवण्याचे आदेशित केले. दरम्यान, प्रशासनाचा बोलविता धनी वेगळाच असल्याने पाणीकपातीवरून पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणीकपातीवरून महापालिकेतील सत्ताधारी आघाडी आणि भाजपा यांच्यात संघर्ष टोकाला जाऊन पोहोचला आहे. गेल्या गुरुवारी त्र्यंबकेश्वरी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या महापूजेसाठी आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गंगापूर धरणातील आणखी ३०० दलघफू पाणी महापालिकेसाठी आरक्षित करण्याचे जाहीर केले होते. याशिवाय, वाढीव पाणीकपातीची गरज नसल्याचेही स्पष्ट केले होते. आमदार बाळासाहेब सानप यांनीही वाढीव पाणीकपात होणार नसल्याचे ठामपणे सांगितले होते. वाढीव पाणी आरक्षण मिळाल्याने आता पाणीकपात होणार नाही, असे मानले जात असतानाच गेल्या ५ फेबु्रवारीपासून शहरात नागरिकांकडून पाण्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. वाढत्या तक्रारींचे प्रमाण लक्षात घेऊन उपमहापौर गुरुमित बग्गा आणि शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी त्याबाबत शोधकार्य सुरू केले असता महापालिका प्रशासनाने गेल्या चार दिवसांपासून छुपी पाणीकपात सुरूकेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मंगळवारी दुपारी उपमहापौरांसह सर्व गटनेत्यांनी महापौरांची भेट घेऊन छुप्या पाणीकपातीचे धक्कादायक वास्तव अगदी आकडेवारीनिशीच मांडले. उपलब्ध आकडेवारीनुसार, १५ टक्के पाणीकपात सुरू असताना गंगापूर आणि दारणा धरणातून प्रतिदिन १२.६० दलघफू पाणी उचलले जात होते. दि. १ ते ३१ जानेवारी २०१६ या कालावधीत गंगापूर धरणातून ३५७.६८ दलघफू, तर दारणातून ३२.९७ दलघफू पाणी उचलले गेले.