शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

छुपी पाणीकपात, कारभारी अंधारात!

By admin | Updated: February 10, 2016 00:17 IST

प्रशासनाचा प्रताप : पदाधिकाऱ्यांकडून भांडाफोड, कपात रद्दचे महापौरांचे आदेश

 नाशिक : शहराला वाढीव पाणीकपातीची गरज नाही आणि ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा गंगापूर धरणसमूहात उपलब्ध असल्याचा वारंवार दावा एकीकडे पालकमंत्री करत असताना महापालिका प्रशासनाने मात्र नियमित १५ टक्के पाणीकपातीव्यतिरिक्त सुमारे १० टक्के वाढीव पाणीकपात कारभाऱ्यांना अंधारात ठेवत छुप्या पद्धतीने लागू केली असल्याचे उघडकीस आले आहे. महापौर, उपमहापौरांसह गटनेत्यांनीच आकडेवारीनिशी छुप्या पाणीकपातीचा भांडाफोड करत प्रशासनाला चिमटीत पकडले. पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी प्रायोगिक तत्त्वावर सदर पाणीकपात सुरू केल्याची कबुली दिल्यानंतर महापौरांनी सदर वाढीव पाणीकपात तत्काळ रद्द करण्याचे आणि पालकमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणेच नियमित १५ टक्के पाणीकपात सुरू ठेवण्याचे आदेशित केले. दरम्यान, प्रशासनाचा बोलविता धनी वेगळाच असल्याने पाणीकपातीवरून पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणीकपातीवरून महापालिकेतील सत्ताधारी आघाडी आणि भाजपा यांच्यात संघर्ष टोकाला जाऊन पोहोचला आहे. गेल्या गुरुवारी त्र्यंबकेश्वरी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या महापूजेसाठी आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गंगापूर धरणातील आणखी ३०० दलघफू पाणी महापालिकेसाठी आरक्षित करण्याचे जाहीर केले होते. याशिवाय, वाढीव पाणीकपातीची गरज नसल्याचेही स्पष्ट केले होते. आमदार बाळासाहेब सानप यांनीही वाढीव पाणीकपात होणार नसल्याचे ठामपणे सांगितले होते. वाढीव पाणी आरक्षण मिळाल्याने आता पाणीकपात होणार नाही, असे मानले जात असतानाच गेल्या ५ फेबु्रवारीपासून शहरात नागरिकांकडून पाण्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. वाढत्या तक्रारींचे प्रमाण लक्षात घेऊन उपमहापौर गुरुमित बग्गा आणि शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी त्याबाबत शोधकार्य सुरू केले असता महापालिका प्रशासनाने गेल्या चार दिवसांपासून छुपी पाणीकपात सुरूकेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मंगळवारी दुपारी उपमहापौरांसह सर्व गटनेत्यांनी महापौरांची भेट घेऊन छुप्या पाणीकपातीचे धक्कादायक वास्तव अगदी आकडेवारीनिशीच मांडले. उपलब्ध आकडेवारीनुसार, १५ टक्के पाणीकपात सुरू असताना गंगापूर आणि दारणा धरणातून प्रतिदिन १२.६० दलघफू पाणी उचलले जात होते. दि. १ ते ३१ जानेवारी २०१६ या कालावधीत गंगापूर धरणातून ३५७.६८ दलघफू, तर दारणातून ३२.९७ दलघफू पाणी उचलले गेले.