शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

पहाटेपासून सुरू झालेल्या या पावसाने दिवसभर संततधार कायम ठेवल्याने सूर्यदर्शनही होऊ शकले नाही. ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात ...

पहाटेपासून सुरू झालेल्या या पावसाने दिवसभर संततधार कायम ठेवल्याने सूर्यदर्शनही होऊ शकले नाही. ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येऊन अनेक नद्या, नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. नाशिक शहरातही पहाटेपासून सुरू झालेला पाऊस दिवसभर कायम होता. त्यामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम झाला. तसेच अगोदरच कोरोनामुळे ईद सणावर आलेले निर्बंध व त्यात दिवसभर पावसाची रिपरिपमुळे मुस्लीम बांधवांच्या ईदचा आनंदही काहीसा फिका पडला.

चौकट===

अनेक गावांचा संपर्क तुटला

त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी या पावसाच्या माहेरघरी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने अनेक गावांना जोडणाऱ्या मोऱ्या पाण्याखाली गेल्याने दळणवळण यंत्रणा ठप्प झाली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे टाकेदेवगाव येथील गावाला जोडणारे वावीहर्ष व देवगाव येथील रस्त्यातील पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने या गावांचा त्र्यंबकेश्वरशी संपर्क तुटला. त्यामुळे या गावांहून खोडाळाकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्यावर वाहतूक वळविण्यात आली आहे.

पेठ तालुक्यातील मौजे देवीचामाळ येथील खुबेटी नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे देवीचामाळ, वाजवड व वडपाडा या तीन गावांचा संपर्क तुटला आहे.

चौकट===

धरणसाठ्यात वाढ

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणक्षेत्रात सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत ९० मिलीमीटर इतका पाऊस नोंदविला गेल्याने गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात दिवसभर पाऊस सुरूच राहिल्याने गंगापूर समूहात पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांच्या पाणीसाठ्यात कमीअधिक वाढ होण्यास पावसाने मदत झाली आहे.