शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

शहरात वाढला उन्हाचा चटका; तापमानाचा पारा 39.3 अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:14 IST

--- नाशिक : शहराच्या कमाल तापमानामध्ये शनिवारी(दि.10) पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. यामुळे उकाड्यात वाढ जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना ...

---

नाशिक : शहराच्या कमाल तापमानामध्ये शनिवारी(दि.10) पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. यामुळे उकाड्यात वाढ जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात शनिवारी 39.3 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविले गेले. पुढील चार दिवसांत मध्य व उत्तर महाराष्ट्रातसुद्धा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. शहरात शनिवारी अधूनमधून ढगाळ हवामानही बघावयास मिळाले.

नाशिक शहरामध्ये गेल्या आठवडाभरापासून त्यांना चा तडाखा हा वाढलेला दिसून येत आहे पस्तीशीच्या जवळपास राहणारे कमाल तापमान शनिवारी अचानकपणे 39.3 अंशापर्यंत पोहचल्याने दमट हवामान आणि उष्मा वाढल्याचा अनुभव नाशिककरांना आला. दिवसभर नागरिक घामाघूम झाले होते. पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रांच्या वापरावर अधिकाधिक भर देत नागरिकांनी वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळविण्याचा प्रयत्न केला.

शनिवारी दुपारी अधूनमधून ढगदेखील दाटून आल्याने वातावरणातील दमटपणा वाढला होता. किमान तापमानसुद्धा 19 अंशपर्यंत जाऊन पोहचल्याने नागरिकांना रात्रीही उष्म्याचा सामना करावा लागत आहे.

वाऱ्याची बदलणारी दिशा आणि तामिळनाडूच्या अंतर्गत किनारपट्टीवरून कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश व लगतच्या भागाकडे सरकत असल्याने वाऱ्याच्या दिशेत बदल होताना दिसत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे मागील 48 तासांत मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागांत अवकाळी सरी कोसळल्या. वाऱ्याच्या द्रोणीय भागाच्या प्रभावामुळे येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची श्यक्यता हवामान खात्याकडून वर्तविली गेली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीटदेखील होण्याचा धोका वर्तविला गेला आहे. काही शहरांमध्ये वाऱ्याचा ताशी वेग वाढलेला दिसून येईल. यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मुंबई हवामान प्रादेशिक विभागाच्या शुभांगी भुते यांनी सांगितले.