शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
4
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
5
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
6
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
7
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
8
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
9
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
10
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
11
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
12
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
13
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
14
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
15
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
16
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
17
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
18
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
19
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
20
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी

बरे झाले बदल्या टळल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:14 IST

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा विषय हा संवेदनशील व नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. गेल्या वर्षी बदल्या झाल्या नाहीत, त्यावेळी कोरोनाची ...

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा विषय हा संवेदनशील व नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. गेल्या वर्षी बदल्या झाल्या नाहीत, त्यावेळी कोरोनाची असलेली जीवघेणी परिस्थिती पाहता, ना कर्मचाऱ्यांनी बदल्या करण्याची मागणीचे धाडस केले, ना शासनानेही या भानगडीत पडण्याला प्राधान्य दिले. यंदा त्या मानाने काहीशी परिस्थिती निवळली असल्याने शासनाने कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला व अशा प्रकारे शासनाचे आदेश येतील अशी बहुधा अटकळ बांधूनच जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व खातेप्रमुखांकडून बदलीपात्र कर्मचाऱ्यांची माहितीही गोळा केली. शासनाचे आदेश प्राप्त होताच, प्रशासन कामाला लागले, बदल्या कशा करायच्या याचा फार्म्युलाही ठरला, ठिकाणही निश्चित झाले. मात्र ग्रामसेवकांच्या पदोन्नती प्रकरणात जो काही अनुभव प्रशासनाला आला, त्यातून सार्वत्रिक बदल्यांची चुणूक दिसून आली. पदोन्नती नको आणि बदलीही नको अशी ग्रामसेवकांनी घेतलेली भूमिका पाहता, अन्य संवर्गातील बदल्यांमध्ये यापेक्षा काही वेगळा अनुभव प्रत्ययास येण्याची सुतराम शक्यता नसल्याची जाणीव प्रशासनाला झाली. त्यातूनच पुढे बदल्यांपासून पळ काढण्यासाठी जिल्हा परिषदेत ४० टक्के जागा रिक्त असल्याचे कारण पुढे करण्यात आले. आता बदल्यांचा चेंडू शासनाच्या कोर्टात टाकून प्रशासनाने नामनिराळे राहण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात कर्मचाऱ्यांची कमतरता ही पूर्णत: प्रशासकीय बाब असल्याने त्याबाबत प्रशासन अवगत नसेलच असे मानले तर प्रशासनाच्या कार्यतत्परतेवर शंका घेण्यास वाव आहे आणि जर प्रशासनाला अगोदरच कर्मचाऱ्यांची वाणवा अवगत असेल आणि तरीदेखील बदल्या करण्याचा घाट घातला जात असेल तर ‘हात दाखवून अवलक्षण’ करून घेण्याची हौस म्हणावी लागेल. असो कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा पूर्णपणे प्रशासकीय भाग आहे, भाकरी करपू नये म्हणून ती फिरवत ठेवायला हवी. अनेक कर्मचाऱ्यांनी वर्षानुवर्षे एकाच जागेवर आपली खुर्ची शाबीत ठेवली आहे तर अनेकांना आपल्यावर कायमच अन्याय होतो अशी भावना झाली आहे. अशा वेळी सर्वांना समान या तत्त्वावर न्याय देण्याचे प्रशासनाचे काम आहे. मात्र त्यासाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरावे लागेल, हवेत बाण मारून नव्हे !

- श्याम बागुल