शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

खंडित वीजपुरवठ्यामुळे हैराण

By admin | Updated: January 3, 2017 23:11 IST

खेळखंडोबा : रोहित्र बदलून देण्याची मागणी

पाथरे : सिन्नर तालुक्यातील मीरगाव-पाथरे परिसरातील ईशान्येश्वर मंदिराजवळील रोहित्र बंद पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. सदर रोहित्र बदलून देण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.  मीरगाव व पाथरे परिसरातील ईशान्येश्वर मंदिराजवळील विठ्ठल शेळके यांच्या शेतात असलेले रोहित्र दीड महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. विहिरीत पाणी असूनही पिकांना देत नसल्याचे चित्र आहे. सदर रोहित्रावरून परिसरातील सुमारे २५ विहिरींवरील कृषिपंपांची वीजजोडणी केली आहे. तथापि, खंडित वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे दुरापास्त बनले असून, गहू, हरभरा, कांदा या पिकांसह डाळींबबागा धोक्यात सापडल्या आहेत.  ईशान्येश्वर मंदिर परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती देण्यासह लेखी तक्रारही नोंदविली आहे. तरीही दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. डाळींबबागा शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असून, त्याच जर पाण्यावाचून उद्ध्वस्त झाल्या तर शेतकरी आर्थिक संकटात सापडल्या वाचून राहणार नाही. त्वरित रोहित्र बदलून द्यावे अशी मागणी कॅप्टन अशोककुमार खरात, विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश हिंगे, दत्तू शिंदे,  विठ्ठल शेळके, रशरद गव्हाणे, बाबासाहेब शेळके, विजय हिंगे, भागवत शेळके, रखमा शेळके, शिवाजी घुमरे, भाऊ हिंगे, नारायण हिंगे यांनी केली आहे. (वार्ताहर)