शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

बायकोकडून होतोय छळ; कोरोना काळात २५ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन काळात अनेकांच्या घरांमध्ये एक ना अनेक कारणांवरून मतभेद होऊन वादविवादाचे प्रसंग घडले. अनेकदा ...

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन काळात अनेकांच्या घरांमध्ये एक ना अनेक कारणांवरून मतभेद होऊन वादविवादाचे प्रसंग घडले. अनेकदा वादविवादाला अगदी क्षुल्लक कारणेही पुरेशी ठरल्याचे पोलिसांकडे आलेल्या तक्रारींवरून दिसून येते. शहरातील भरोसा सेलकडे (महिला सुरक्षा शाखा) अशाचप्रकारे या काळात महिलांच्या घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. कधी मोबाईल मग्नता, तर कधी कामाचा वाढता व्याप, तर पतीकडून कामाच्या व्यापामुळे केली जाणारी चिडचिड... अशा विविध कारणांमुळे दाम्पत्यांमध्ये वाद घडले. त्याचप्रमाणे मुलांकडे लक्ष न देणे, स्वयंपाकात चुका करत आई-वडिलांच्या प्रकृतीविषयी काळजी न दाखविल्याचा आरोप करीत ९०७ पतींकडून त्यांच्या पत्नीविरुद्ध छळ केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे मागील सहा महिन्यांत दाखल झाल्या आहेत. या तक्रारींमधील तथ्य शोधण्याचे मोठे आव्हान आता ‘भरोसा सेल’पुढे उभे राहिले असून, पती-पत्नींचे जाब-जबाब नोंदवून घेत तक्रार अर्जांची चौकशी केली जात आहे.

---इन्फो--

आर्थिक टंचाई अन्‌ जास्त सहवास

कोरोना काळात पती-पत्नीमध्ये सहवास अधिकाधिक वाढला. दोघांनाही एकमेकांसोबत जास्त वेळ घालविण्यास वाव मिळाला; मात्र याचे काही कुटुंबांमध्ये दुष्परिणामही दिसून आले, तर काहींनी ही एक चांगली संधी म्हणून एकमेकांची काळजी घेत समजून घेण्याचा प्रयत्नही केला. आर्थिकदृष्ट्‌या निर्माण झालेली टंचाईदेखील वादविवादाच्या ठिणगीला कारणीभूत ठरत आहे.

-

---

अशी आहेत वाद-विवादाची कारणे...

मुलांच्या अभ्यासाकडे ती सतत दुर्लक्ष करते.

कामाचा व्याप वाढल्याने सतत घरात चिडचिड करीत वृद्ध सासू-सासऱ्याकडे दुर्लक्ष करते.

नोकरीच्या ठिकाणचा कामाचा किंवा वरिष्ठांविषयीचा राग घरात व्यक्त करणे.

मोबाईलवर सारखे का बोलते? अशा विविध तकलादू कारणांवरून पतींकडून पत्नीविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत.

---पॉइंटर्स---

पुरुषांच्या महिलांविरुद्ध तक्रारी - २४

महिलांच्या पुरुषांविरुद्ध तक्रारी - ९०७

भरोसा सेलकडे आलेल्या एकूण तक्रारी - ९३१

----इन्फो--

३१ बायका पुुन्हा नांदण्यास...

कोरोना काळात उद‌्भवलेल्या वादविवादाच्या प्रसंगानंतर भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारींनंतर पती-पत्नींची समजूत पोलिसांकडून काढण्यात आली. संसारवेल कोमेजू देऊ नये, यासाठी सप्तपदीत एकमेकांना दिलेल्या वचनांचे स्मरण पोलिसांकडून करून देण्यात आले. तसेच बहुतांश दाम्पत्यांचे समुपदेशनही पोलिसांनी केले. पतीपासून दुरावलेल्या ३१ महिलांचे एप्रिलअखेरपर्यंत मनपरिवर्तन करण्यास पोलिसांना यश आले. ९७ दाम्पत्यांमध्ये न्यायालयात समझोता झाला.

250721\25nsk_12_25072021_13.jpg

बायकोकडून छळ