शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बायकोकडून होतोय छळ; कोरोना काळात २५ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन काळात अनेकांच्या घरांमध्ये एक ना अनेक कारणांवरून मतभेद होऊन वादविवादाचे प्रसंग घडले. अनेकदा ...

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन काळात अनेकांच्या घरांमध्ये एक ना अनेक कारणांवरून मतभेद होऊन वादविवादाचे प्रसंग घडले. अनेकदा वादविवादाला अगदी क्षुल्लक कारणेही पुरेशी ठरल्याचे पोलिसांकडे आलेल्या तक्रारींवरून दिसून येते. शहरातील भरोसा सेलकडे (महिला सुरक्षा शाखा) अशाचप्रकारे या काळात महिलांच्या घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. कधी मोबाईल मग्नता, तर कधी कामाचा वाढता व्याप, तर पतीकडून कामाच्या व्यापामुळे केली जाणारी चिडचिड... अशा विविध कारणांमुळे दाम्पत्यांमध्ये वाद घडले. त्याचप्रमाणे मुलांकडे लक्ष न देणे, स्वयंपाकात चुका करत आई-वडिलांच्या प्रकृतीविषयी काळजी न दाखविल्याचा आरोप करीत ९०७ पतींकडून त्यांच्या पत्नीविरुद्ध छळ केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे मागील सहा महिन्यांत दाखल झाल्या आहेत. या तक्रारींमधील तथ्य शोधण्याचे मोठे आव्हान आता ‘भरोसा सेल’पुढे उभे राहिले असून, पती-पत्नींचे जाब-जबाब नोंदवून घेत तक्रार अर्जांची चौकशी केली जात आहे.

---इन्फो--

आर्थिक टंचाई अन्‌ जास्त सहवास

कोरोना काळात पती-पत्नीमध्ये सहवास अधिकाधिक वाढला. दोघांनाही एकमेकांसोबत जास्त वेळ घालविण्यास वाव मिळाला; मात्र याचे काही कुटुंबांमध्ये दुष्परिणामही दिसून आले, तर काहींनी ही एक चांगली संधी म्हणून एकमेकांची काळजी घेत समजून घेण्याचा प्रयत्नही केला. आर्थिकदृष्ट्‌या निर्माण झालेली टंचाईदेखील वादविवादाच्या ठिणगीला कारणीभूत ठरत आहे.

-

---

अशी आहेत वाद-विवादाची कारणे...

मुलांच्या अभ्यासाकडे ती सतत दुर्लक्ष करते.

कामाचा व्याप वाढल्याने सतत घरात चिडचिड करीत वृद्ध सासू-सासऱ्याकडे दुर्लक्ष करते.

नोकरीच्या ठिकाणचा कामाचा किंवा वरिष्ठांविषयीचा राग घरात व्यक्त करणे.

मोबाईलवर सारखे का बोलते? अशा विविध तकलादू कारणांवरून पतींकडून पत्नीविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत.

---पॉइंटर्स---

पुरुषांच्या महिलांविरुद्ध तक्रारी - २४

महिलांच्या पुरुषांविरुद्ध तक्रारी - ९०७

भरोसा सेलकडे आलेल्या एकूण तक्रारी - ९३१

----इन्फो--

३१ बायका पुुन्हा नांदण्यास...

कोरोना काळात उद‌्भवलेल्या वादविवादाच्या प्रसंगानंतर भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारींनंतर पती-पत्नींची समजूत पोलिसांकडून काढण्यात आली. संसारवेल कोमेजू देऊ नये, यासाठी सप्तपदीत एकमेकांना दिलेल्या वचनांचे स्मरण पोलिसांकडून करून देण्यात आले. तसेच बहुतांश दाम्पत्यांचे समुपदेशनही पोलिसांनी केले. पतीपासून दुरावलेल्या ३१ महिलांचे एप्रिलअखेरपर्यंत मनपरिवर्तन करण्यास पोलिसांना यश आले. ९७ दाम्पत्यांमध्ये न्यायालयात समझोता झाला.

250721\25nsk_12_25072021_13.jpg

बायकोकडून छळ