शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

गारपिटीने द्राक्षनिर्यातीला तडाखा

By admin | Updated: March 30, 2015 00:28 IST

गारपिटीने द्राक्षनिर्यातीला तडाखा

नाशिक : द्राक्ष उत्पादकांच्या आणि निर्यातक्षम द्राक्षबागांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर यंदा द्राक्षांची विक्रमी निर्यात होईल असे वाटत असतानाच झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. त्या गारपिटीचा फटका बसून मागील वर्षीच्या तुलनेत द्राक्षनिर्यातीत सुमारे १० टक्के घट झाल्याचे अपेडाची आकडेवारी सांगते. त्यामुळे २० मार्चपर्यंत यंदा ३६०७८ मेट्रिक टन म्हणजेच २८३२ कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली आहे.मागील वर्षी राज्यातून २९ मार्चपर्यंत ३९२३१ मेट्रीक टन म्हणजेच ३०६३ कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा आत्तापर्यंत केवळ २८३२ कंटेनरची निर्यात झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यात सुमारे ३२०० मेट्रीक टनांची घट झाली आहे. यंदा द्राक्षांचे उत्पादन आणि निर्यात दोन वर्षांच्या तुलनेत चांगली राहील असे वाटत होते. उत्पादनही तसेच आले होते. निर्यातक्षम द्राक्षांना परदेशात ५० ते ६० रुपये प्रतिकिलो असा दर मिळतो आहे. त्याची विक्री परदेशी व्यापारी भारतीय चलनानुसार २०० ते २५० रुपये किलोने करतात. आणखी किमान महिनाभर द्राक्षांचा हंगाम चालू राहणार असून, मागच्या वर्षीचे निर्यातीचे रेकॉर्ड तुटेल असा अंदाज वर्तविला जातो आहे. युरोप, चीन, चिली, दक्षिण आफ्रिका यांसह इतर देशांमधील द्राक्षांचा दर्जा भारतीय द्राक्षांपेक्षा चांगला आणि वाहतूक खर्च आपल्या खर्चाच्या तुलनेत केवळ २५ टक्केच असल्याने त्यांच्या उत्पादनाला चांगली मागणी असते. असे असले तरी त्याची उत्पादन क्षमता भारतापेक्षा कमी असल्याने परदेशी द्राक्षांच्या उत्पादनानंतरही भारतीय द्राक्षांची परदेशातील मागणी कायम राहाते. एकूण निर्यात ४००० कंटेनरपर्यंत जाऊ शकेल असा अंदाज वर्तविला जातो आहे. द्राक्षांच्या निर्यातीत सुमारे ७५ टक्के वाटा एकट्या नाशिक जिल्ह्याचा असतो असे आकडेवारीवरून दिसून येते. नाशिक जिल्ह्यातून मार्जअखेर एकूण सुमारे २२०० कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत तेही घटले आहे. असे असले तरी येणाऱ्या काळात जर वातावरण चांगले राहिले तर निर्यात मागील वर्षीचा स्तर पार करू शकते आणि ओलांडू शकते असाही अंदाज लावला जातो आहे. (प्रतिनिधी)