शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीने द्राक्षनिर्यातीला तडाखा

By admin | Updated: March 30, 2015 00:28 IST

गारपिटीने द्राक्षनिर्यातीला तडाखा

नाशिक : द्राक्ष उत्पादकांच्या आणि निर्यातक्षम द्राक्षबागांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर यंदा द्राक्षांची विक्रमी निर्यात होईल असे वाटत असतानाच झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. त्या गारपिटीचा फटका बसून मागील वर्षीच्या तुलनेत द्राक्षनिर्यातीत सुमारे १० टक्के घट झाल्याचे अपेडाची आकडेवारी सांगते. त्यामुळे २० मार्चपर्यंत यंदा ३६०७८ मेट्रिक टन म्हणजेच २८३२ कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली आहे.मागील वर्षी राज्यातून २९ मार्चपर्यंत ३९२३१ मेट्रीक टन म्हणजेच ३०६३ कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा आत्तापर्यंत केवळ २८३२ कंटेनरची निर्यात झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यात सुमारे ३२०० मेट्रीक टनांची घट झाली आहे. यंदा द्राक्षांचे उत्पादन आणि निर्यात दोन वर्षांच्या तुलनेत चांगली राहील असे वाटत होते. उत्पादनही तसेच आले होते. निर्यातक्षम द्राक्षांना परदेशात ५० ते ६० रुपये प्रतिकिलो असा दर मिळतो आहे. त्याची विक्री परदेशी व्यापारी भारतीय चलनानुसार २०० ते २५० रुपये किलोने करतात. आणखी किमान महिनाभर द्राक्षांचा हंगाम चालू राहणार असून, मागच्या वर्षीचे निर्यातीचे रेकॉर्ड तुटेल असा अंदाज वर्तविला जातो आहे. युरोप, चीन, चिली, दक्षिण आफ्रिका यांसह इतर देशांमधील द्राक्षांचा दर्जा भारतीय द्राक्षांपेक्षा चांगला आणि वाहतूक खर्च आपल्या खर्चाच्या तुलनेत केवळ २५ टक्केच असल्याने त्यांच्या उत्पादनाला चांगली मागणी असते. असे असले तरी त्याची उत्पादन क्षमता भारतापेक्षा कमी असल्याने परदेशी द्राक्षांच्या उत्पादनानंतरही भारतीय द्राक्षांची परदेशातील मागणी कायम राहाते. एकूण निर्यात ४००० कंटेनरपर्यंत जाऊ शकेल असा अंदाज वर्तविला जातो आहे. द्राक्षांच्या निर्यातीत सुमारे ७५ टक्के वाटा एकट्या नाशिक जिल्ह्याचा असतो असे आकडेवारीवरून दिसून येते. नाशिक जिल्ह्यातून मार्जअखेर एकूण सुमारे २२०० कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत तेही घटले आहे. असे असले तरी येणाऱ्या काळात जर वातावरण चांगले राहिले तर निर्यात मागील वर्षीचा स्तर पार करू शकते आणि ओलांडू शकते असाही अंदाज लावला जातो आहे. (प्रतिनिधी)