शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तासिका तत्वावरील गुरुजींना करावे लागतेय मिळेल ते काम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:19 IST

नाशिक : कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनुदानाच्या मुद्यावरून रान पेटले आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या उच्चशिक्षित युवक-युवतींना तासिका तत्वावर ...

नाशिक : कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनुदानाच्या मुद्यावरून रान पेटले आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या उच्चशिक्षित युवक-युवतींना तासिका तत्वावर काम मिळत होते. कोरोनाने तेही हिरावले असून, आता अनेकजण आपला पारंपरिक व्यवसाय किंवा अन्य मिळेल त्या ठिकाणी नोकरी करून उदरनिर्वाह भागवित आहेत. यात बहुसंख्य पात्रताधारक शिक्षक अथवा पदवीधर शेतकरी कुटुंबातून येत असल्याने त्यांना उच्च शिक्षण घेऊनही पुन्हा शेतीत कष्ट करावे लागत आहेत. राज्य सरकारने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु सरकार बदलले तरीदेखील आश्वासनांव्यतिरिक्त काहीच पदरात पडले नसल्याने पात्रताधारक शिक्षक व पदवीधरांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

----

राज्यात १७-१८ हजार सहायक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. तासिका तत्वावरील प्राध्यापक, शिक्षकांच्या नियुक्त्याही रखडल्या आहे. तासिका दर वाढवून देण्याबाबत शासनाने पत्र काढले, परंतु अद्याप दर वाढविलेले नाहीत. त्यामुळे तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना जीवन कसे जगायचे, असा प्रश्न सतावत आहे. यातून शासनाने मार्ग काढण्याची अपेक्षा आहे.

-उमेश जाधव , पात्रताधारक शिक्षक

शासन प्राध्यापक भरतीबाबत अत्यंत उदासीन आहे. हजारो जागा रिक्त असतानाही शासनाकडून पदभरती होत नाही. तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना मानधनही कमी मिळते. त्यामुळे अनेकांना अध्यापनासोबत शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागतो.

- प्रा. किशोर साळवे, पात्रता धारक शिक्षक

वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्वावर नोकरी करताना जे निकष ठरविले आहेत, त्या निकषानुसार आज हजारो युवक-युवती तासिका तत्वावर काम करीत आहेत. अनेकांनी पीएचडी मिळविलेली आहे. परंतु, एवढे शिक्षण घेऊनही जर बेरोजगार राहण्याची वेळ येत असेल तर, या शिक्षणाचा उपयोग तरी काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

- संकेत ठूबे, तासिका शिक्षक

---

सेट-नेट बेरोजगारांची समस्या वेगळीच

सेट-नेट झालेल्या शेकडो उच्च शिक्षितांची समस्याही गंभीर बनली आहे. उच्च शिक्षितांची बेरोजगारी वाढत आहे. त्यांची नियुक्ती किंवा रोजगार उपलब्ध केला नाही, तर त्यांचे वय वाढेल. त्यांची कौशल्यशक्ती संपत आहे. नेट-सेट, पीएच.डी, एमफील करण्यासाठी जीवनातील ७-८ वर्षे खर्ची घालावी लागतात. त्यानंतरही नोकरी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. नंतर नोकरी मिळाली, तरीही ती केवळ १२-१५ वर्षेच करावी लागते. कारण वय वाढलेले असते. यासोबतच प्राध्यापक भरतीसाठी मोठ्या प्रमाणात डोनेशन मागितले जाते. एवढा पैसा आणायचा तरी कोठून? त्यामुळे प्राध्यापक संघटनांकडून भरती प्रक्रियाही आयोगामार्फत करावी. सहायक प्राध्यापकांनी प्रति दिवस दीड हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी होत आहे. तरच त्यांची आर्थिक बाजू मजबूत होईल.

१० वर्षांपासून लटकला प्रश्न

गत दहा वर्षांपासून सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया लटकली आहे. प्राध्यापकांच्या संघटनांनी यासाठी सातत्याने आंदोलने केली. परंतु शासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागांचा अनुशेष वाढत आहे. राज्यातील १३ हजारांवर सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. आंदोलने केल्यावर संघटनांना केवळ भरतीचे आश्वासन दिले जाते, परंतु पुढे काहीच केल्या जात नाही. तासिका तत्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती तासिका दरात वाढ आदी प्रश्न प्रलंबितच आहेत.