शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

विकास दराचा आलेख ‘अच्छे दिन’चे द्योतक

By admin | Updated: June 8, 2016 23:06 IST

सुभाष भामरे : सटाणा येथे विविध कार्यक्रम

 सटाणा : आपल्या देशाचा विकास दर गेल्या दोन वर्षांपूर्वी म्हणजेच यूपीए सरकारच्या काळात चार टक्के होता. या दोन वर्षांच्या मोदी सरकारच्या काळात हा विकास दर ७.६५ टक्क्यांवर आला आहे. हा विकासाचा वाढता आलेखच खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’चे द्योतक असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.केंद्रातील एनडीए सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने सटाणा शहरात खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर असोसिएशन, वकील संघ, व्यापारी संघटना, हमाल मापारी व महायुतीच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. यावेळी जनधन विमा योजना, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अशा विविध महत्त्वाकांक्षी योजनांबद्दल माहिती दिली. परदेशी कंपन्यांनी ६५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्याचा बेकारी दूर होण्यास मोठा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. युरिया, इथेनॉल, कोळसा आणि विजेच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट करून इंदूर-धुळे-मनमाड रेल्वे मार्गासाठी खास बाब म्हणून विशेष आर्थिक तरतूद केल्यामुळे या कामाला गती मिळून आपल्या भागाचा विकास होण्यास मदत होणार असल्याचे खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले. सटाणा बायपास रस्त्याबाबत ते म्हणाले की, पश्चिमेकडून होणाऱ्या बायपाससाठी मुंजवाड व तरसाळीच्या १२० शेतकऱ्यांनी हरकती घेतल्यामुळे आता दुसरा पर्याय समोर आला असून, वनोली ते चौंधाणे हा रस्ता केंद्राच्या राखीव निधीमधून सात मीटर रुंद करून हा मार्ग राज्यमार्ग १९ ला जोडून मुंजवाड,ङ्क्तदऱ्हाणेवरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. या बायपासबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही खासदार डॉ. भामरे यांनी संबधित यंत्रणेला दिल्या. यावेळी रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, संजय भामरे, मुन्ना सोनवणे, बिंदू शर्मा, अण्णा अहिरे, नीलेश पाकळे, राजेंद्र देवरे, जिभाऊ मोरकर, राहुल सोनवणे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)