शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने द्राक्ष, लाल कांद्यावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:41 IST

मानोरी : येवला तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असताना अचानक अवकाळीच्या सरी कोसळू लागल्याने ...

मानोरी : येवला तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असताना अचानक अवकाळीच्या सरी कोसळू लागल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, लाल कांदा लागवड, द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने सातत्याने औषध फवारणी करावी लागत असल्याचे दिसून आले आहे.

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड , जळगाव नेऊर, शिरसगाव, पिंपळगाव लेप, जऊळके आदी परिसरात मुसळधार पावसामुळे रोपांचे अतोनात नुकसान झाल्यानंतर नव्याने रोपे विकत घेऊन उशिरा उन्हाळ कांदा लागवड करण्यात शेतकरी व्यस्त आहे. मात्र ही नव्याने केलेली कांदा लागवड ढगाळ वातावरण, दाट धुके आणि अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडली असून, कांद्याचे शेंडे पिवळसर पडण्याच्या भीतीने शेतकरी वर्गाकडून औषध फवारणी केली जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.अनेक ठिकाणी लाल कांदा काढणीला आला असून, काही ठिकाणी सुरुवातदेखील केली आहे. अशातच अवकाळी पावसाच्या धास्तीने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला असल्याचे सर्वत्र दिसून आले आहे.

ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकरीदेखील पूर्णतः धास्तावला आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून पुढील काही दिवसांत द्राक्षघड तोडणीला सुरुवात होणार आहे. मोठ्या मेहनतीने घेतलेल्या द्राक्षबागांना वारंवार औषध फवारणी करून चांगल्या प्रकारे फळेदेखील लागली आहेत.

-----------

महागड्या औषधांची फवारणी

वातावरणातील बदलामुळे सातत्याने महागडी औषध फवारणी करून द्राक्षबाग जगवलेली असताना आता चांगल्या प्रकारे फळे लागली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याने अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच त्रेधा उडाली आहे. गत तीन ते चार दिवसांत मानोरी परिसरात दोनदा अवकाळीच्या सरी कोसळल्या असून, त्यात पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे द्राक्ष फळावर पाणी साचून मण्यांवर काळे डाग पडत आहे. यातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.

--------------

द्राक्ष काढणी अंतिम टप्प्यात

द्राक्ष फळ हे वर्षातून एकदा येते असल्याने वर्षाकाठी लाखो रुपये खर्चून द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. मात्र ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या सरींनी मागील तीन ते चार दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून, या हवामान बदलाचा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू होणार असल्याने त्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

---------------

तोडणीला आलेली द्राक्षबाग, काढणीला आलेला लाल कांदा. (०७ मानोरी १/२)

===Photopath===

070121\07nsk_10_07012021_13.jpg

===Caption===

०७ मानोरी १