शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

अवकाळी पावसाने द्राक्ष, लाल कांद्यावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:41 IST

मानोरी : येवला तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असताना अचानक अवकाळीच्या सरी कोसळू लागल्याने ...

मानोरी : येवला तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असताना अचानक अवकाळीच्या सरी कोसळू लागल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, लाल कांदा लागवड, द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने सातत्याने औषध फवारणी करावी लागत असल्याचे दिसून आले आहे.

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड , जळगाव नेऊर, शिरसगाव, पिंपळगाव लेप, जऊळके आदी परिसरात मुसळधार पावसामुळे रोपांचे अतोनात नुकसान झाल्यानंतर नव्याने रोपे विकत घेऊन उशिरा उन्हाळ कांदा लागवड करण्यात शेतकरी व्यस्त आहे. मात्र ही नव्याने केलेली कांदा लागवड ढगाळ वातावरण, दाट धुके आणि अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडली असून, कांद्याचे शेंडे पिवळसर पडण्याच्या भीतीने शेतकरी वर्गाकडून औषध फवारणी केली जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.अनेक ठिकाणी लाल कांदा काढणीला आला असून, काही ठिकाणी सुरुवातदेखील केली आहे. अशातच अवकाळी पावसाच्या धास्तीने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला असल्याचे सर्वत्र दिसून आले आहे.

ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकरीदेखील पूर्णतः धास्तावला आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून पुढील काही दिवसांत द्राक्षघड तोडणीला सुरुवात होणार आहे. मोठ्या मेहनतीने घेतलेल्या द्राक्षबागांना वारंवार औषध फवारणी करून चांगल्या प्रकारे फळेदेखील लागली आहेत.

-----------

महागड्या औषधांची फवारणी

वातावरणातील बदलामुळे सातत्याने महागडी औषध फवारणी करून द्राक्षबाग जगवलेली असताना आता चांगल्या प्रकारे फळे लागली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याने अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच त्रेधा उडाली आहे. गत तीन ते चार दिवसांत मानोरी परिसरात दोनदा अवकाळीच्या सरी कोसळल्या असून, त्यात पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे द्राक्ष फळावर पाणी साचून मण्यांवर काळे डाग पडत आहे. यातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.

--------------

द्राक्ष काढणी अंतिम टप्प्यात

द्राक्ष फळ हे वर्षातून एकदा येते असल्याने वर्षाकाठी लाखो रुपये खर्चून द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. मात्र ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या सरींनी मागील तीन ते चार दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून, या हवामान बदलाचा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू होणार असल्याने त्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

---------------

तोडणीला आलेली द्राक्षबाग, काढणीला आलेला लाल कांदा. (०७ मानोरी १/२)

===Photopath===

070121\07nsk_10_07012021_13.jpg

===Caption===

०७ मानोरी १