शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

सोयीच्या ठेकेदारासाठी शासकीय नियम धाब्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:15 IST

कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा अन्य कोणाला संसर्ग होऊ नये यासाठी विद्युत शवदाहिनीत मृतदेहाचे दहन करणे हे सुरक्षित ठरत आहे. ...

कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा अन्य कोणाला संसर्ग होऊ नये यासाठी विद्युत शवदाहिनीत मृतदेहाचे दहन करणे हे सुरक्षित ठरत आहे. त्यामुळे वेळ देखील कमी लागत असल्याने अमरधाममध्ये ताण वाढला तरी अंत्यसंस्काराला फार वेळ लागत नाही. पर्यावरण स्नेही असलेल्या दोन विद्युत शवदाहिनी नाशिक अमरधाममध्ये बसवण्यात आल्या आणि त्या कार्यान्वितदेखील झाल्या आहेत. परंतु दुसरीकडे अन्य तीन ठिकाणी अशाच प्रकारे शवदाहिनी बसवण्यासाठी मात्र भलताच प्रकार सुरू आहे.

महापालिकेने १८ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या निविदेत असलेल्या अनेक अटी नंतरच्या काळात बदल्यात आल्या. शासनाच्या नियमानुसार दीड कोटी रुपयांच्यावरील काम असेल तर त्याला सॉव्हन्सी सर्टिफिकेट आवश्यक असते. ती अट काढण्यात आली तर दुसरीकडे रोड मिक्सिंग प्लँट आवश्यक असल्याची अटदेखील २ मार्च राेजी हटवण्यात आली. दुसऱ्यांदा म्हणजेच १५ मार्च रोजी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली तेव्हा निविदेचे पूर्ण डॉक्युमेंट बदल देण्यात आली. तसेच गुणवत्तेच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असलेला मॅन्युफॅक्चरर्स मेकची अटदेखील हटवण्यात आली. त्यामुळे दुय्यम दर्जाची साधने महापालिका वापरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिसऱ्यांदा मुदतवाढ देताना कल्याणी एन्टरप्रायझेस, व्हिजन एन्टरप्रायझेस, कांता इलेक्ट्रीकल असे तीन उत्पादकांना ॲड करण्यात आली.

अलीकडेच स्मार्ट सिटीने विद्युत दाहिनी बसवली आहे. ती सुरळीत सुरू आहे. त्यासाठी देखील अटी शर्ती घालण्यात आल्या होत्या, त्यात काही अडचणी आल्या नाहीत, मग आत्ताच अडचणी का आल्या असा प्रश्न निर्माण झाला आहे.

इन्फो...

गुणवत्तेच्या साऱ्या अटी वगळल्या

विद्युत दाहिनी बसवताना संबंधित ठेकेदाराने गुणवत्ता राखण्यापेक्षा ती कमी कशी होईल असेच जणू अधिकाऱ्यांनी कटाक्षाने बघितले आहे. ठेकेदाराला जॉइंट व्हेंचरची अट घालून कोणालाही आता धंदा मांडता येईल, अशी सोय करण्यात आली आहे. तसेच ठेकेदाराकडे तांत्रिक कर्मचारी असले पाहिजे ही अटच वगळ्यात आल्याने महापालिका हा खटाटोप कोणासाठी करीत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर बँक सर्टीफिकेट, अंडर टेकिंग, बिड कॅपिसिटी कंडिशन काढण्यात आली आहे.